Heatstroke : विदर्भात उष्माघाताचे नऊ बळी; नागपूर शहरातच सहा जणांचा मृत्यू

Heatstroke In Vidharbha : विदर्भात सध्या उष्णतेची लाट आली असून यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागपूर शहरातील सहा जणांचा समावेश आहे.
Heatstroke
Heatstroke Agrowon

Pune News : राज्याच्या काही भागात सध्या उष्णतेची लाट उसळलेली आहे. उष्माघाताने विदर्भात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे शनिवारी (ता.१) समोर आले आहे. यामधील सहा जणांचा मृत्यू एकट्या नागपूर शहरातील असून भंडाऱ्यातील दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. शनिवारी विदर्भातील विविध जिल्ह्यात ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. नागपूरात ४५.५ तर वर्ध्यात ४६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नागपूर शहरात उष्माघाताचे सहा बळी

यादरम्यान नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सहा जणांचा मृत्यू उष्माघाताने झाला. ज्यात दोन ४० वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. एक व्यक्ती मेकोसाबाग पुलाखाली तर दुसरी व्यक्ती खोब्रागडे चौकात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घोटाळ-पांजरी मार्गावर देखील एका ४५ वर्षीय इसमाचा आणि नारी मेट्रो स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने मृत्यू झाला.

Heatstroke
Heatstroke : मुक्या जीवांनाही उष्माघाताचा धोका

तसेच मोमिनपुरा परिसरात देखील शुक्रवारी (ता.३१) सायंकाळी ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाला. तर ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानकाजवळ एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शहरात हे सहा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Heatstroke
Heatstroke Room : कोल्हापुरातील ७६ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष

भंडाऱ्यात तीघांचा मृत्यू

नागपूर शहरात उष्माघाताने सहा जणांचे बळी दोन दिवसात गेले असतानाच भंडारा जिल्ह्यात देखील तिघांचा मृत्यू झाला. यात लाखांदूर तालुक्यातील ४० वर्षीय भास्कर पंढरी भुते यांचा समावेश आहे. भुते शेतात काम करत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर लाखांदूर येथे प्रथमोपचार करून भंडाऱ्यास हालवण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या होत्या. मात्र भंडाऱ्याला नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर धारगाव येथे ७० वर्षीय गतिमंद महिलेचा मृत्यू देखील उष्माघाताने झाला. गोंदिया जिल्ह्यातील ४५ वर्षीय सुरेश उरकुडा गेडाम (ता. अर्जुनी मोरगाव गा. निमगाव) यांचाही मृत्यू उष्माघाताने झाला.

भाजपच्या माजी आमदाराचा आरोप

यादरम्यान भाजप नेते तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. धोटे यांनी, गेल्या तीन दिवसात राजुरा विधानसभा मतदार संघात उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. राजुरा विधानसभा मतदार संघात उन्हाची दाहकता वाढली असून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला. मात्र याची नोंद घ्यायला आरोग्य विभागाला वेळ आहे ना जिल्हा प्रशासनला यावरून धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com