Tarapur News : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने उष्णता वाढली आहे. यामुळे माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कडक उन्हापासून जनावरांचा बचाव करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. मेमध्ये तापमान आणखी वाढू शकते. त्यामुळे जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्याच्या काही परिसरात सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने काही वेळेसाठी उन्हाच्या झळा कमी होत असल्या तरी मात्र वातावरणातील उष्णता कायम आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच पशुंच्याही शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडल्यास अथवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही, याची प्राथमिक काळजी घेणे उपायकारक ठरणारे आहे. त्यांना सावलीत आणि मोकळ्या हवेशीर परिसरात बांधावे. त्यांच्यासाठी थंड जागेसह पाण्याचा वापरण्याचे आवाहन केले.
प्रथमोपचार करावेत!
उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे, हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम शक्य असल्यास पशूंना वातानुकूलित जागेत अन्यथा सावली, थंड ठिकाणी हलवावे. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच शरीर ओल्या कापडाने पुसून घ्यावे, पशुंच्या अंगावर थंड पाणी टाकावे, असे आवाहन करण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.