Nitin Gadkari : पर्यावरण आणि शेती तंत्रज्ञानात मध्य साधण्याची गरज

Agriculture Technology : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने तंत्रज्ञानाचा पुरस्कार करतात. भारतीय शेतीक्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधन उपलब्ध व्हावे, अशी त्यांची अपेक्षा असते.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने तंत्रज्ञानाचा पुरस्कार करतात. भारतीय शेतीक्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधन उपलब्ध व्हावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र ‘एचटीबीटी’च्या विषयावर त्यांनी सावध भूमिका घेत पर्यावरण आणि तंत्रज्ञान या दोन्हींमध्ये मध्य साधण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

श्री. गडकरी यांनी ‘ॲग्रोवन’सोबत विशेष संवाद साधला. या वेळी त्यांनी ‘एचटीबीटी’ हा वादातीत मुद्दा असल्याचे सांगत या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र त्यावेळीच पर्यावरण आणि तंत्रज्ञान या दोन्हींत मध्य साधला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, ‘‘आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळेच मानवी जीवनदेखील सुकर झाले आहे. जागतिकस्तरावरील उपलब्ध तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. त्याशिवाय आपण जागतिकस्तरावर स्पर्धा करू शकणार नाही. कृषी विद्यापीठांनी देखील त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : कुठले पीक लावावे हा सल्ला कृषी विद्यापीठांनी द्यावा

मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. बाजारात शेतीमालाला दर कमी मिळतात. त्याच वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकाची उत्पादकता वाढली तर काही अंशी दर आणि उत्पादकता खर्च यातील तूट भरून निघणे शक्‍य आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हवे आहे.’’

‘‘जगातील इतर सोयाबीन उत्पादक देशाच्या तुलनेत आपण सोयाबीन उत्पादकतेत पिछाडीवर आहोत. देशात महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.

Nitin Gadkari
Nitin gadkari : गडकरी-मुंडेंची विद्यापीठात शिवारफेरी आणि संशोधकांशी संवाद

कापसानंतर सर्वाधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. परिणामी, सोयाबीनची कमी उत्पादकता आपल्याला परवडणारी नाही. त्याच्या वाढीसाठी देखील तंत्रज्ञान, नवे वाण, व्यवस्थापन पद्धतीत बदलांची गरज आहे,’’ असे श्री. गडकरी यांनी सांगितले.

‘सोयाबीन उत्पादकता वाढीचे प्रयत्न व्हावेत’

‘‘एचटीबीटी सद्यःस्थितीत वादातीत मुद्दा ठरला आहे. परिणामी त्याविषयी अधिक भाष्य करणे सयुक्तिक ठरणार नाही. परंतु काही तंत्रज्ञानाच्या बाबतीत पर्यावरण आणि संशोधनात्मक गरज यामध्ये मध्य साधता आला पाहिजे.

भारतीय शेतकरी मोठ्या क्षेत्रावर सोयाबीन घेतात. त्यातील आपली उत्पादकता केवळ ३ ते ४ क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. त्यात वाढीसाठीचे प्रयत्न संशोधन संस्थास्तरावर झाले पाहिजेत, तसेही काही होताना दिसत नाही,’’ अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com