
Nandurbar News : नंदुरबारात पाऊसमान चांगले होते. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कमाल प्रकल्प १०० टक्के भरले होते. परंतु उष्णता वाढत आहे. जलसाठे आजघडीला ५० टक्क्यांखाली असून, पाणीवापर वाढला आहे. या स्थितीत मे अखेरीस टंचाई काही भागांत होईल, अशी स्थिती आहे.
शहाद्यातील दरा, सुसरी, चिरडे तसेच दरा, देहली, वीरचक प्रकल्पांतील किंवा लघु प्रकल्पांतील जलसाठे घटले आहेत. शिवारात यंदा टंचाई नाही. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट होत आहे. तसेच दरा, देहली या प्रकल्पांत जलसाठा १०० टक्के होता. परंतु हा साठाही कमी होत आहे. डिसेंबरमध्येही अनेक नद्यांत पाणी होते. परंतु पुढे उष्णता वाढेल.
पाऊसमान लांबल्यास अडचण येईल. सध्या नंदुरबार तालुक्यातील काही भागांत टंचाईचे संकेत दिसत आहेत. पण शहादा व तळोदा भागातील टंचाईची स्थिती कमी राहील. नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, सातपुडा भागात काहीशी टंचाई मे अखेरीस राहील, असेही दिसत आहे. नंदुरबारला वीरचक्र धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी झराळी येथे फिल्टर प्लाँट पालिकेने कार्यान्वित केला आहे.
तेथून शहराला पुरवठा होतो. धरण दर वर्षी पूर्ण क्षमतेने भरते. गेल्या वर्षी नंदुरबारात कधी दोन दिवसांआड, तर कधी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करून पाणीटंचाईचे संकट टळले होते.
नंदुरबार शहरासाठी जीवनवाहिनी असलेल्या शिवण नदीला यंदा पाणी वेगाने आल्याने वीरचक धरण भरण्यास मदत झाली. पण, पुढे पावसाळा लांबल्यास सिंचन प्रकल्पात पाणी येईल कुठून? अशी स्थिती आहे. त्यामुळे पाण्याची काटकसर करावी लागणार असून, पाणीपुरवठा करताना काटेकोर नियोजन केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.