
Dharashiv News : धाराशिव : जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरिपात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे.
खरिपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडले आहेत. नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान ६२०० ते ६५०० रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ७९१ शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना नोंदवल्या होत्या.
नोंदविण्यात आलेल्या एकूण ५ लाख ३२ हजार ८२६ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या आहेत.
पात्र ठरलेल्या या ५ लाख ३२ हजार ८२६ पूर्वसूचनांपैकी ४ लाख ७० हजार ७२ पूर्वसूचना एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत. वरील सर्व पात्र पूर्वसूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे.
विमाकंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांचा हेक्टरी रक्कम ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.