Dry Water Projects : गिरणा पट्ट्यातील अनेक प्रकल्प कोरडे

Water Stock : खानदेशात सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी खालावली असून, ती लवकरच १० टक्क्यांवर येईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे अन्य मध्यम, लघू प्रकल्पदेखील कोरडे होत आहेत.
Water Stock
Water StockAgrowon

Jalgaon News : खानदेशात सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी खालावली असून, ती लवकरच १० टक्क्यांवर येईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे अन्य मध्यम, लघू प्रकल्पदेखील कोरडे होत आहेत.

गिरणा नदीवरील गिरणा धरण खानदेशातील सर्वांत मोठे धरण आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक लाभ जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आदी भागांस आहे. नाशिकमधील मालेगाव शहर, नांदगाव शहर आणि मालेगावातील उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते. तसेच जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांसह १२० गावांच्या पाणी योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत.

Water Stock
Almatti Dam : ‘अलमट्टी’च्या पाण्यावर महाराष्ट्राचे नियंत्रण हवे

या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. कमी पावसामुळे धरण फक्त ५६ टक्के भरले होते. धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने त्यातून रब्बीस पाणी मिळाले नाही. गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरवर रब्बी उभा होऊ शकला नाही. या धरणातून चार वेळेस नदीत आवर्तन सोडण्यात आले आहे. या धरणात १० दिवसांपूर्वी सुमारे २० टक्के जलसाठा होता. आवर्तन सुटल्यानंतर हा जलसाठा १० टक्क्यांपर्यंत येईल, अशी माहिती देण्यात आली होती.

गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी क्षेत्र आहे. या भागातील लहान-मोठे तलाव, मध्यम प्रकल्प कोरडे झाले आहेत. चाळीसगावातील मन्याड, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, पारोळ्यातील भोकरबारी, एरंडोलातील अंजनी आदी प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे.

Water Stock
Girna Dam : गिरणा धरणातून आवर्तन सुटणार

मन्याड प्रकल्प कोरडा आहे. पारोळ्यातील भोकरबारी, बोरी, म्हसवे लघु प्रकल्पातही जलसाठा घटला आहे. बोरी प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता. परंतु उष्णतेमुळे पाण्याचा वापर यंदा अधिक राहीला आहे. तामसवाडी, भोकरबारी व म्हसवे प्रकल्पात पाणी होते. परंतु अन्य प्रकल्पांत जलसाठाच नव्हता. सावखेडा येथील इंदासी प्रकल्पदेखील कोरडा आहे. तामसवाडी प्रकल्पातून तामसवाडी, बोळे, शेवगे, टोळी, पिंप्री, मुंदाणे, हिवरखेडा आदी गावांना पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. यामुळे तामसवाडी प्रकल्पातील जलसाठाही झपाट्याने कमी झाला आहे.

पूर्वमशागतीची कामे पूर्ण

यंदा पाऊस लवकर व चांगला येईल, असे भाकित विविध हवामानसंस्था करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. पारोळा, पाचोरा, चाळीसगाव भागात कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. या भागात पाऊस आल्यानंतर पेरणी होईल. सध्या पूर्वमशागत करून ठेवण्यात आली आहे. अन्य शेतकरी पाऊस आल्यानंतर मशागत करून पेरणी करतील, असेही नियोजन दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com