Maratha Reservation: जरांगेंनी दिली राज्य सरकारला उद्या सकाळी ११ पर्यंत वेळ; आझाद मैदानावर जाण्याबद्दल ठाम

सरकारला उद्या सकाळी ११ पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे आजचा मुक्काम वाशीत करतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अध्यादेश काढण्यासाठी मुदत दिली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilAgrowon
Published on
Updated on

राज्य सरकारला ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत, असा दावा राज्य सरकार करत आहे. त्या नोंदी सापडलेल्या नोंदीच्या आधारे सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढावा. त्या अध्यादेशासाठी उद्या (ता.२७) सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ देतो. पण अध्यादेश काढला नाही तर मग आझाद मैदानावर उद्या पोहचू आणि आमरण उपोषण करू. आरक्षण मिळालं तर आझाद मैदानावर गुलाल उधाळायला जाऊ, नाही मिळालं आमरण उपोषणासाठी जाऊ. पण आझाद मैदानावर जाणारच, अशीही माहिती जरांगे यांनी दिली.

सरकारला उद्या सकाळी ११ पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे आजचा मुक्काम वाशीत करतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला अध्यादेश काढण्यासाठी मुदत दिली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. राज्य सरकारच्या वतीने समाजकल्याणचे सचिव सुमंत भांगे यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. सरकार मागण्याबद्दल सकारात्मक आहे, पण सरकारने काढलेले अध्यादेश आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, असंही मराठा आंदोलकांशी चर्चा करताना मनोज जरांगे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं वाचन मराठा आंदोलकांच्या समोर करत त्यातील त्रुटीवर बोट ठेवलं. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर मराठा मुलामुलींना १०० टक्के मोफत शिक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने जारी करावा. तसेच राज्यातील ५४ लाख कुणबी नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं, त्याचा अध्यादेश सरकारने काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. वंशावळ जुळाली की १०० टक्के आरक्षण मिळणारच, असंही जरांगे म्हणाले.

पुढे जरांगे म्हणाले, "५४ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्र द्या, अशी आपली मागणी होती. नोंदीची माहिती ग्रामपंचायत समोर लावा, अशी मागणी होती. त्याबाबत राज्य सरकारनं कार्यवाही सुरू केली आहे. पण त्याआधारे सग्यासोयऱ्यातील इतरांनाही प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी आहे. शिष्टमंडळाच्या चर्चेत वंशावळ जुळवण्यासाठी समितीही गठीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. तुम्ही अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे अर्ज करा, असं आवाहन जरांगे यांनी केलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेनं हजारो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे निघाले आहेत. परंतु मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीना वेग आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com