Climate Impact on Mango Farming: वाढत्या तापमानामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात फळगळ वाढल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे..जिल्ह्यात या वर्षी आंबा पिकामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. धुके, ढगाळ वातावरणामुळे मोहर करपल्याने या वर्षी ९० टक्के आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांचा भरवसा केवळ १० ते १५ टक्के पिकांवर आहे. मात्र पिकांवर देखील आता वाढत्या तापमानवाढीचे संकट उभे राहिले आहे..Mango Fruit Drop Issue: पालीत आंबागळतीचे वाढत्या उन्हामुळे संकट.गेल्या तीन-चार दिवसांत ३८ अंश सेल्शिअसची नोंद मुळदे संशोधन केंद्रावर झाली आहे. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असून, या उष्म्याचा विपरीत परिणाम आंबा पिकावर होऊ लागला आहे. काढणीला आलेल्या आंबा फळांची गळ होऊ लागली असल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे..Mango Farmer Demands: आंबा बागायतदारांना हेक्टरी दोन लाख रुपये द्या.या वर्षी आंबा हंगामाचा गुढीपाडव्याचा मुहूर्त अनेक शेतकऱ्यांना चुकला. त्यामुळे अधिकतर शेतकरी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्याचा विचार करीत होते. परंतु फळगळ होऊ लागल्याने आंबा बागायतदारांची धास्ती वाढली आहे..गेल्या काही दिवसांत वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. माझ्या बागेत काढणीला आलेल्या फळांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे.व्ही. के. सावंत, आंबा उत्पादक, असरोंडी, ता. मालवण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.