Mango Crop Damage : जयगड पंचक्रोशीत आंबा, काजूचे नुकसान
Ratnagiri News : हवामान विभागाचा (Weather Department) अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी (ता. २१) दुपारी चारच्या सुमारास जयगड पंचक्रोशीसह आजूबाजूच्या परिसराला वीस मिनिटे मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बागायतदारांची त्रेधातिरपीट उडाली.
याचा परिणाम आंब्यावर होणार असून करप्याचा (mango Disease) प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून हापूस वाचवण्यासाठी किडनाशक फवारणीचा खर्च वाढणार आहे.
रत्नागिरी व रायगडसह राज्यातील अन्य जिल्ह्यांत मंगळवारी दुपारनंतर चार तासांत विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला होता.
त्यानुसार मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास समुद्र किनारी परिसरात जयगड, खंडाळा, पन्हळी, वाटद, सैतवडे, जांभारी, कासारी, कचरे, वरवडेसह खाडी पट्ट्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
वेगवान वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. खंडाळा बाजारपेठेत रस्त्यावरील फेरीवाल्यांनी सुरक्षित ठिकाणी साहित्य हलवले. त्यात अनेकांचे साहित्य भिजले.
आंबा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक बागायतदारांनी लाकडी पेटीचे साहित्य, गवत मोकळ्या जागेत ठेवले होते.
ते पावसात भिजू नये यासाठी प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवण्यासाठी धावपळ उडाली. या पावसामुळे आंबा, सुपारीसह काजूचे नुकसान होणार आहे. पावसाचा जोर वीस मिनिटे होता.
जयगड पंचक्रोशीतील बागायतदार आशिष भालेराव म्हणाले, की या पावसामुळे जयगड पंचक्रोशीतील आंबा बागायतदार अडचणीत येणार आहेत. यंदा आंबा उशिराने आहे.
आंबा कमी आणि कामगार खर्च, कराराच्या बागांसाठीची गुंतवणूक, किडनाशक फवारणी, वाहतूक यासाठी बँकांचे कर्ज बागायतदारांनी घेतले आहे. या पद्धतीने वादळी पाऊस पडत राहिला तर परिस्थिती बिकट होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.