Maharashtra Disabled Welfare: महाराष्ट्रात दिव्यांगांना सर्वांत कमी मानधन, शासनाच्या धोरणावर संताप

Maharashtra Disability Honorarium: महाराष्ट्रात दिव्यांगांना फक्त १५०० रुपये मानधन दिले जाते, जे इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शासनाच्या अनास्थेमुळे दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे लवकरच आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
Disabled Citizens
Disabled CitizensAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : दिव्यांग व्यक्तीला इतर राज्यांमध्ये चार ते सहा हजार रुपये मानधन दिले जाते, त्यावेळी महाराष्ट्रात केवळ १५०० रुपये मानधन दिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा, असा आदेश असताना या आदेशाची बहुतांश संस्थांकडून अंमलबजावणीच होत नाही. यावर कुणाचाही वचक नाही. दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले.

Disabled Citizens
Maharashtra Government: फुले दाम्पत्याला भारतरत्नसाठी महाराष्ट्राची केंद्राला शिफारस

राज्यात लाखोंच्या संख्येने दिव्यांग बांधव आहेत. त्यांनाही योग्यरीत्या जीवन जगता यावे, त्यांच्याही अधिकारांचे रक्षण व्हावे, यासाठी शासनाकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना अधिक गतीने राबविण्यात येईल, दिव्यांगांचे जीवन सुसह्य होईल, अशी अपेक्षा होती.

Disabled Citizens
Educational Government GR : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन निर्णय रद्द करा

परंतु, या मंत्रालयाचा एकूणच कारभार आणि या मंत्रालयाविषयी असलेली शासकीय अनास्था पाहता या मंत्रालयाच्या अध्यक्षांनीच काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. या वेळी त्यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी या मंत्रालयाचे काम सुरूच झाले नसल्याचा गौप्यस्फोट केला. दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांचे कल्याण करू शकत नसल्याने आपण या पदावरून दूर होत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

राजस्थान, केरळसह इतर अनेक राज्यांत दिव्यांगांना चांगले मानधन मिळते. त्या तुलनेत महाराष्ट्रातील दिव्यांगांना निम्मेही मानधन दिले जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाही पाच टक्के निधी खर्च करीत नाही. दिव्यांगांप्रति शासनाचे उदासीन धोरण आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर ‘करो या मरो’ हे आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास राज्यस्तरावर दिव्यांगांच्या हक्कासाठी आंदोलन तीव्र केले जाईल.
बच्चू कडू, माजी अध्यक्ष, दिव्यांग कल्याण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com