Jalna News : बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांची दाणादाण उडाली.जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देणे अपेक्षित असताना केवळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. .त्यामुळे आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, तर मग आम्हाला मदत कशी मिळेल? असा संतप्त सवाल बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी आणि बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांनी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे बुधवारी (ता. २४) केला. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या पंचनाम्यात दुजाभाव होत असल्याची ओरडही केली..Crop Damage: पावसाने पावणेदोन लाख हेक्टरला बाधा.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीत गोकुळवाडी आणि बाजार गेवराई शिवारातील कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीची बुधवारी (ता. २४) पाहणी केली. यावेळी कृषिमंत्री श्री. भरणे यांनी एकाही शेतकऱ्याच्या एकही गुंठ्याचा पंचनामा शिल्लक राहणार नाही. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत पोचवली जाईल, असे आश्वासन दिले. .यावेळी त्यांच्या समवेत आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण यांची उपस्थिती होती.गोकुळवाडी शिवारात आगमन होताच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरकृषीमंत्री श्री. भरणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून बदनापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या एकेका गुंठ्याचा सरसकट पंचनामा करावा, असे आदेश दिले. .Crop Damage Survey: अतिवृष्टी पंचनाम्यात फोटोसक्तीची पाचर.यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी बाजार गेवराई शिवारातील ओंकार ढाकणे यांच्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या कापूस आणि गोकुळवाडी शिवारातील दादाराव भडांगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागा उध्वस्त झाल्याचे सांगितले. तसेच जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधन दगावले, शेडनेटचे देखील नुकसान झाल्याची व्यथा मांडली. .यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले, एकट्या जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने २ लाख ५४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ८० लाख एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कुणाच्या घरात पाणी शिरले, कुणाच्या घराची पडझड झाली, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, काही ठिकाणी पशुधन वाहून गेले अशा सर्व नुकसानीची जाणीव सरकारला आहे. .सरसकट पंचनामे झाल्यावर अहवाल प्राप्त होताच दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर मदत पोचवली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर दौंड, जिल्हा कृषी अधीक्षक जी. आर. कापसे, जिल्हा कृषी उपाधिक्षक पी. एस. पवार, तालुका कृषी अधिकारी गोपाल गुजर, नायब तहसीलदार श्री. बने, ज्योती राठोड, डॉ. डी. एम. गोल्हेर, डॉ. एस. एम. सदाशिवे उपस्थित होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.