
Washim News: खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले ‘महाडीबीटी’ पोर्टल सध्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे. २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या बियाण्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ३ जूनपर्यंत वाढवण्यात आली असली तरी ऑनलाइन अर्ज सादर करताना ‘एरर’ येत आहे.
शेतकरी फार्मर आयडी वापरून महा-ई-सेवा केंद्रांवरून अर्ज करीत आहेत. मात्र राज्यभरात अर्ज सबमिट करताना २३ रुपये ६० पैसे शुल्क भरल्यानंतर देखील अर्ज अपूर्ण राहत आहे. पैसे खात्यातून कपात होतात, परंतु अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
काही ठिकाणी या त्रुटीमुळे शेतकरी आणि ई-सेवा केंद्र चालकांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. शेतकरी शुल्क भरण्यास नकार देत आहेत. कारण अर्ज सबमिट झालेला नसतो. दुसरीकडे ई-सेवा केंद्र चालकांचे पैसे कपात होऊन देखील अर्ज निष्फळ ठरत असल्याने ते देखील अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अयशस्वी झालेले अर्ज वैध मानावेत आणि अर्ज मुदतीला आणखी वाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
या आहेत मागण्या :
- तांत्रिक अडचण दूर करून पोर्टल सुरळीत करावे.
- यापूर्वी अयशस्वी झालेले अर्ज वैध धरावे.
- अर्ज प्रक्रियेची मुदत पुन्हा वाढवावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.