
Solapur News : यंदाच्या खरीप हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी सोलापूर जिल्हयात गेल्या १० दिवसांत केवळ आठ हजार १७३ शेतकऱ्यांनी १५ हजार ३६६ अर्ज भरले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत या संख्येत मोठी घट झाली आहे. येत्या ३१ जुलैला विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत किती शेतकरी यामध्ये सहभागी होतील, याबाबतही साशंकता आहे.
या आधी शेतकरी फक्त एक रुपया भरून विमा योजनेत सहभागी होऊ शकत होते. पण यंदाच्यावर्षी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के व नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के इतका हप्ता भरावा लागणार आहे.
तर नव्या योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर रद्द केले असून, केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर नुकसान भरपाई मिळणार आहे. या नव्या योजनेसाठी एक जुलैपासून शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरून घेण्यात येत आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पाहता
पीकविमा भरण्यास शेतकरी अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. या १० दिवसांत केवळ आठ हजार १७३ शेतकऱ्यांनी १५ हजार ३६६ अर्ज भरले आहेत. जिल्ह्यासाठी बाजरी, मूग, खरीप ज्वारी, भुईमूग, कापूस, उडीद, मका, कांदा, तूर, सोयाबीन ही पिके अधिसूचित केली आहेत. ही पिके संपूर्ण जिल्ह्यासाठी नव्हे तर मंडल व तालुकानिहाय वेगवेगळी पिके अधिसूचित केली आहेत.
अधिसूचित पिकांचे क्षेत्र संबंधित तालुका व मंडलात अत्यल्प आहे. तर ज्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे ती पिके त्या भागासाठी अधिसूचित नसल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी पीकविमा भरता येत नाही, हेही कारण यामागे असल्याचे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.