Irrigation Schemes Loan Waiver : सिंचन योजनांची १३२ कोटींची कर्जमाफी

Agriculture Irrigation Update :राज्यातील अवसायनात व नोंदणी रद्द झालेल्या तसेच कार्यरत सिंचन संस्थांची १३२ कोटी ५४ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यास मान्यता दिली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील अवसायनात व नोंदणी रद्द झालेल्या तसेच कार्यरत सिंचन संस्थांची १३२ कोटी ५४ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अवसायनात व नोंदणी रद्द झालेल्या शेती सिंचन योजनांचे ८३ कोटी ९ लाख तर कार्यरत असलेल्या संस्थांचे निम्मे म्हणजे ४९ कोटी ४५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. १४) घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील ४२ हजार ८४२ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Agriculture Irrigation
Irrigation Scheme : निम्न तेरणा उपसा सिंचनच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता

सध्या राज्यात २ हजार ६५९ उपसा सिंचन सहकारी संस्था असून २६१ संस्थांकडे बँकांची थकबाकी आहे. या संस्थांपैकी १४४ संस्था सध्या सुरू असून ४७ संस्था अवसायनात व ७० संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवसायनातील व नोंदणी रद्द झालेल्या ११७ संस्थांचे मुद्दल कर्ज ८३ कोटी ९ लाख माफ करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे सध्याच्या कार्यरत १४४ संस्थांचे ५० टक्के मुद्दल कर्ज अशी ४९ कोटी ४५ लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे एकूण १३२ कोटी ५४ लाख मुद्दल कर्जमाफ करण्यास मान्यता देण्यात आली.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : टेंभूच्या लाभक्षेत्रानजीक उंचीवरच्या १५०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

राज्यातील शेतकऱ्यांनी शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्त्वावर उपसा सिंचन संस्थांची स्थापना केली आहे. या सिंचन योजनांना विविध वित्तीय संस्था आणि बँकांनी कर्जपुरवठा केला होता. यासाठी शेतकऱ्यांची जमीन तारण ठेवण्यात आली होती. या संस्था डबघाईला आल्याने अवसायनात गेल्या तर काही बंद झाल्या. तसेच सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. काही शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीला याचा फटका बसत होता. शेतीवर कर्जाचा बोजा नोंद असल्याने नव्याने कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या संस्थांची कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

शासनाचा सध्याचा निर्णय फायद्याचा असला तरी शासनाने इथून पुढेही अशा संस्थांना दुर्लक्षित ठेवू नये. संस्थांना सहकारी बँकांतून कमी व्याज दराने कर्ज पुरवठा केल्यास संस्था पुन्हा चांगल्या चालू शकतील. याबरोबरच अनुदानही वेळेत द्यावे, अशी आमची प्रमुख म्हणून मागणी आहे.
विक्रांत पाटील किणीकर, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com