Canal Leakage : टंचाईच्या झळांना कालवा गळतीची धार

Water Scarcity : खडकवासला कालव्याच्या सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणाच्या कामाला तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्याने काँक्रीटला मोठी भगदाडे पडली असून, काही ठिकाणी पूर्ण काँक्रीट निघाले आहे.
Canal Leakage
Canal LeakageAgrowon
Published on
Updated on

Pune News : खडकवासला कालव्याच्या सिमेंट काँक्रीटच्या अस्तरीकरणाच्या कामाला तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्याने काँक्रीटला मोठी भगदाडे पडली असून, काही ठिकाणी पूर्ण काँक्रीट निघाले आहे. त्यामुळे पाणीगळती व बाष्पीभवन प्रमाण एवढे आहे की कालव्याला बाराशे क्युसेक सोडलेले पाणी इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला सरासरी शंभर क्युसेकने पोहचते.

जिल्ह्यातील हवेली, दौंड व इंदापूर या तालुक्यांमध्ये दरवर्षी अल्प प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या तालुक्यातील काही भागातील शेतकरी व ग्रामस्थांना खडकवासला कालव्याच्या पाण्याचा आधार मिळतो. मात्र, कालव्याचा भराव जीर्ण झाल्याने गेल्या काही वर्षांत अनेक वेळा कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.

Canal Leakage
Water Leakage : वाहिनीतील गळतीमुळे पाणीटंचाईच्या झळा

कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता १४०० क्युसेक आहे. मात्र दुरवस्था झाल्याने एवढे क्षमतेने पाणी सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे साधारणतः प्रत्येक आवर्तनाला बाराशे ते तेराशे क्युसेकने पाणी सोडले जाते. मात्र कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती व बाष्पीभवन होते. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला सरासरी शंभर क्युसेक पाणी पोहोचते.

Canal Leakage
Canal Leakage : येडगाव धरणावरील डाव्या कालव्याला गळती

धरणातून खडकवासला कालव्यात सोडलेले पाणी आणि गळती व बाष्पीभवन होऊन शेतीसाठी मिळणारे पाणी यामध्ये मोठी तफावत आहे. अनेक वेळा कालव्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही व यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठवूनही दखल घेण्यात आली नाही. यापूर्वी फक्त कालव्यातील गाळ व झाडेझुडपे काढण्याचे काम केले आहे. ही कामेही अत्यंत निकृष्ट पद्धतीची झाले आहेत.

ही दुरुस्तीची कामे म्हणजे ठेकेदार जगवण्याची रोजगार हमी योजना असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. पाणी गळतीसंदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

खडकवासला कालव्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भातील दुरुस्तीचे प्रस्ताव अनेक वेळा पाठवूनही शासन स्तरावर ठोस पावले उचलली जात नाहीत. पावसाचे अल्प प्रमाण व पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन कालवा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे.
- रवींद्र जाधव, निवृत्त उपअभियंता पाटबंधारे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com