
Latur News : लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार सभासदांना विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून ‘जनता अपघात विमा’ बँकेने स्वीकारली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३३० मृत शेतकरी सभासदांच्या वारसांना १८ कोटी ७५ लाख रुपयांची विम्याची रक्कम दिल्याचे बँकेतर्फे जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात नावलौकिक आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना बँकेने सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यांतील १ हजार ३३० मृत शेतकरी सभासदांच्या वारसांना जनता अपघात विमाच्या माध्यमातून १८ कोटी ७५ लाख रुपये मिळवून दिले आहेत.
पाच मृत शेतकऱ्यांच्या वारसांना १७.७५ लाख रुपयांचे धनादेश जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख, अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालक पाटील, भगवानराव तळेगावकर, पृथ्वीराज शिरसाठ, राजकुमार पाटील, दिलीप नागराळकर, मारोती पांडे, स्वयंप्रभा पाटील, लक्ष्मी भोसले, सपना किसवे, अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.