Climate Change : जमिनीचे तापमान हा तर ‘कृषी’च्या अखत्यारीतील विषय

Global Warming : जमिनीचे तापमान आणि वातावरण बदल हा विषय जागतिक स्तरावर चिंतेचा झाला आहे.
Heat wave
Heat WaveAgrowon

Nagpur News : जमिनीचे तापमान आणि वातावरण बदल हा विषय जागतिक स्तरावर चिंतेचा झाला आहे. पाकिस्तानने वातावरण बदल याविषयावर स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने मात्र भौगोलिक तापमानाशी आपला संबंध असून जमीन तापमान हा कृषी खात्याच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगत जबाबदारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आहे.

वातावरण बदलाचे दूरगामी परिणाम दैनंदिन मानवी कार्यपद्धतीसोबत शेतीवरही प्रभाव टाकणारे आहेत. त्यामुळेच अनेक देशांमध्ये याविषयावर संशोधनात्मक पातळीवर काम सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद तर बदलत्या वातावरणाला पूरक वाण संशोधनावर भर देत आहे.

Heat wave
Climate Change : वातावरण बदलामुळे अन्नसुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

सर्वच पातळीवर अशाप्रकारे काम सुरू असताना भारतीय हवामान खात्याने मात्र हा आपल्याशी निगडीत विषयच नसल्याचे सांगितले आहे. मातीचा संबंध हा कृषी विभागाशी असल्याने जमिनीच्या तापमानाशी संबंधित बाबींच्या नोंदी त्यांच्या स्तरावर घेतल्या जातात, असे ‘आयएमडी’कडून सांगण्यात आले. काही ठिकाणी ‘आयएमडी’कडून जमीन तापमान नोंदविले जाते. हा डेटा कृषी विभागाला दिला जातो, असेही सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये स्वतंत्र मंत्रालय...

वातावरणातील बदलाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान सरकारने संशोधनाला चालना मिळावी याकरिता स्वतंत्र मंत्रालयच निर्माण केले आहे. ४ ऑगस्ट २०१७ मध्ये स्थापन या मंत्रालयात १७३ कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५८ अधिकारी व ११५ कर्मचारी आहेत. २०१८-१९ मध्ये ८०२.६९ दशलक्ष (पाकिस्तानी मूल्य) रुपयांचे बजेट याकरिता मंजूर केले जाते.

Heat wave
Climate Change : वातावरण बदल हा कृषी विभागासाठी चिंतनीय

या माध्यमातून तापमानातील वाढ, अनिश्चित पाऊस व इतर बाबींच्या नोंदी घेत सोशल मीडिया, रेडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम होते. सद्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे या मंत्रालयाचा कारभार पाहत असून त्यांच्या समन्वयक रुमीना खुर्शीद आलम यांच्याकडे याची जबाबदारी आहे.

वातावरणातील आर्द्रता, तापमान तसेच पाऊस अशाप्रकारच्या नोंदी घेण्याचे काम भारतीय हवामान खात्याचे आहे. जमीन आरोग्य तसेच तापमान अशा सर्वांची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे. वातावरणातील बदलानुरुप आम्ही तापमान किती राहील, पाऊस कधी आणि किती पडेल याविषयी सांगण्यास आता सक्षम आहोत. अचूक अंदाज वर्तविण्यात आम्ही आता सर्वात पुढे आहोत. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानामुळे आम्ही अचूक अंदाज सांगण्यास समर्थ ठरलो आहोत. ही मोठी जबाबदारी असताना अन्य काम ‘आयएमडी’कडून होणे शक्‍य नाही.
- डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा, महासंचालक, भारतीय हवामान खाते, दिल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com