Jalgaon News: खानदेशात २०२१, २२, २४ आणि २५ मध्येही खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पीकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही भागांत हा निधी प्राप्त झाला आहे, पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .यंदा नुकसानीसंबंधी भरपाई दिली जात आहे. पण ती तोकडी आहे, असा आरोप पाचोरा, चाळीसगाव या भागांतील शेतकरी करीत आहेत. जमिनी खरडून गेल्या, पण पंचनामे अल्प नुकसान भरपाईसाठी टेबलवर बसून केले, असे आरोप शेतकरी करीत आहेत. .Rain Crop Damage: रत्नागिरीतील १८ हजारांवर शेतकऱ्यांचे ३ कोटींचे नुकसान.२०२२ नंतर २३ मध्ये कमी पाऊस झाला. कमी पावसातही नुकसान झाले, पण भरपाईबाबत शासनाकडून कोणतीही घोषणा झाली नाही. २०२४ मध्ये व यंदाही अतिपावसाने पिके हातची गेली. कापूस, उडीद, मूग या पिकांची अतोनात हानी झाली. सर्वेक्षण करण्यात आले. पण भरपाई, मदतनिधी शेतकऱ्यांना आलेला नाही. मध्येच निवडणुका सुरू होतात. त्यात प्रशासन फक्त निवडणुकीचे काम करते. आता निवडणुका पुन्हा सुरू होत आहेत. शेतकऱ्यांना मदतनिधीसंबंधी कार्यवाही करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. .२०२२ मध्ये नुकसानग्रस्त भागाचा मोठा समावेश पंचनामे व्यवस्थित न झाल्याने करण्यात आला नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टीत विविध वर्षांत झाले आहे. धुळ्यात सुमारे ८० हजार व नंदुरबारमध्येही ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पण नुकसानीबाबतची चर्चा लोकप्रतिनिधी सध्या करीत नसल्याचे चित्र आहे..Rain Crop Damage: पावसाने उद्ध्वस्त शेतकऱ्यांची थट्टा.जळगाव तालुक्यात म्हसावद व परिसरात मदतनिधीचे वितरण काही २०२२ मध्ये झाले. पण फक्त १००, ४००, ४०० रुपये एवढा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाची मोठी हानी झाली. सोयाबीनचेदेखील ६० टक्क्यांवर नुकसान झाले. फक्त ज्वारी, मक्याचे काहीसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले..कापूस पिकात अतिवृष्टिनंतर नोव्हेंबरच्या मध्यात गुलाबी बोंड अळीने नुकसान केले. पिकांची अतोनात हानी झाली आहे. पण भरपाई प्राप्त झालेली नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम कसाबसा उभा केला आहे. पंचनामे, सरसकट भरपाई, कोकणच्या धर्तीवर मदत अशी आश्वासने अनेकदा लोकप्रतिनिधी व इतरांनी दिली. परंतु भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. .बागायतदार शेतकरी संकटातदुसरीकडे पपई, केळी उत्पादकांनादेखील फटका बसत आहे. काढणी रखडली आहे. दर परवडत नाही. कापसाची खेडा खरेदी कमी दरात सुरू आहे. कापूस, कांदा, केळी, मका, उडीद, पपई आदी शेतीमालास कवडीमोल दर आहेत. यात दुहेरी संकटांचा सामना शेतकरी करीत असल्याने मदतनिधीची आवश्यकता आहे. पण प्रशासन, शासन लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .पंचनामे, सरसकट भरपाईच्या बाता ऐकल्या. अनेक आश्वासने लोकप्रतिनिधींनी दिली. पण मदतनिधी प्राप्त झालेला नाही. खरिपात सर्वच पिके हातची गेली. मजुरीचा खर्चही निघालेला नाही. कांदा पिकात मोठा तोटा शेतकऱ्यांना आला आहे. पण शासन या समस्यांची दखल केव्हा घेईल, हा प्रश्न आहे. - राजेंद्र पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.