Jayakwadi Dam Water : जायकवाडी, निम्न दुधनाच्या पाणी आवर्तनांचे वेळापत्रक जाहीर

Rabbi Irrigation : परभणी जिल्ह्यात सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या जायकवाडी धरणाचा डावा कालवा तसेच निम्न दुधना, माजलगाव, येलदरी-सिद्धेश्वर या धरणांच्या कालवा सिंचन आवर्तनांचे वेळापत्रक सोमवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Marathwada News : परभणी ः परभणी जिल्ह्यात सर्वाधिक लाभक्षेत्र असलेल्या जायकवाडी धरणाचा डावा कालवा तसेच निम्न दुधना, माजलगाव, येलदरी-सिद्धेश्वर या धरणांच्या कालवा सिंचन आवर्तनांचे वेळापत्रक सोमवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.

जायकवाडीतून रब्बीत ३, उन्हाळी हंगामात ४, निम्न दुधनातून रब्बी, उन्हाळी हंगामात प्रत्येकी ३ पाणी आवर्तने नियोजन आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता पी. बी. लांब यांनी दिली. कालवा सल्लागार समितीच्या शासकीय सदस्याची बैठक सोमवारी (ता. २५) छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यंदा जिल्ह्यात सर्व मोठ्या प्रकल्पाची पाणी आवर्तने मिळणार असल्यामुळे खरीप हंगामातील उत्पादनातील कसर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकातून भरून काढता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यद्वारे रब्बी हंगामात ३ आणि उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तने प्रस्तावित आहेत. रब्बीतील पहिले आवर्तन २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर, दुसरे आवर्तन १ ते २८ जानेवारी, तिसरे आवर्तन १ ते २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. उन्हाळी हंगामात पहिले आवर्तन १ ते २५ मार्च, दुसरे आवर्तन १ ते २५ एप्रिल, तिसरे आवर्तन १ ते २५ मे, चौथे आवर्तन १ ते २५ जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.

सेलू तालु्क्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यद्वारे रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी ३ पाणी आवर्तन प्रस्तावित आहेत. रब्बीतील पहिले आवर्तन २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, दुसरे आवर्तन २३ डिसेंबर ते ५ जानेवारी, तिसरे आवर्तन २० जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन १० ते २३ मार्च, दुसरे आवर्तन ७ ते २० एप्रिल, तिसरे आवर्तन ५ ते १८ मेपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.

येलदरी व सिद्धेश्वर धरणांतून (पूर्णा प्रकल्प) रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी ४ पाणी आवर्तनांचे नियोजन आहे. रब्बीचे पहिले आवर्तन सोमवारी (ता. २५) सोडण्यात आले आहे. पूर्णा प्रकल्पाची परभणी जिल्ह्यात १६ हजार १४२ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात २२ हजार ६५८ हेक्टर सिंचन क्षमता आहे. माजलगाव प्रकल्पातून रब्बीत ३ आणि उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तने प्रस्तावित आहेत. रब्बीत पहिले आवर्तन १५ डिसेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून रब्बीत ३ आणि उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तने प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाची हिंगोली

जिल्ह्यात १७ हजार ५०२ हेक्टर सिंचन क्षमता आहे.

परभणी जिल्हा प्रकल्पनिहाय सिंचन क्षमता (हेक्टरमध्ये)

धरण सिंचन क्षेत्र

जायकवाडी ९७,४४०

येलदरी-सिद्धेश्वर १६,१४२

निम्म दुधना २८,६९८

माजलगाव २०,०२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com