Unseasonal Rain : खानदेशात अनेक भागांत पाऊस

Fear of Loss : पुन्हा एकदा पावसाची समस्या खानदेशात तयार झाली असून, शेतकऱ्यांत नुकसानीची भीती आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News : खानदेशात २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान अनेक भागांत गारपीट व बेमोसमी पाऊस झाला. यात गुरुवारी (ता. २९ फेब्रुवारी) अनेक भागात पाऊस नव्हता. शुक्रवारी (ता. १) पुन्हा एकदा पावसाची समस्या खानदेशात तयार झाली असून, शेतकऱ्यांत नुकसानीची भीती आहे.

यात गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा ढगांची जमवाजव झाली. गुरुवारी रात्री धुळे, जळगावमधील काही मंडलांत हलका पाऊस झाला. शुक्रवारी पहाटेदेखील हलका पाऊस झाला. सुसाट वाराही काही भागात होता. जळगावमधील धरणगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, एरंडोल आदी भागात हलका पाऊस झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : मेहुणबारे परिसरात गारपिटीमुळे केळी, कांद्याचे पीक भुईसपाट

धुळ्यातही धुळे, शिंदखेडा, शिरपूर भागात हलका, तुरळक पाऊस झाला. पावसामुळे पिकांची मळणी, कापणीची कामे ठप्प झाली आहेत. त्यात पुन्हा गारपीट, पावसाचा इशारा हवामान विभागाने धुळे व जळगावसाठी दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंता आहे.

कलिंगड, केळी, पपईची काढणी शेतकरी गारपीटीच्या भीतीने करू न घेत आहेत. कारण गारपिटीत पारोळा व अन्य भागात शेतकऱ्यांच्या कलिंगड, पपईचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान होईल, या भीतीने शेतकरी कमी दरात कलिंगड, पपईची विक्री करीत आहेत. कापणी, मळणीची कामेही उरकून घेतली जात आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain : पावसाने कोट्यवधींची हानी

सकाळीच शेतकरी कापणी, मळणीसंबंधीची कार्यवाही करून घेत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतमालाची कापणी झाली, परंतु मळणीसाठी हार्वेस्टर मिळत नसल्याने शेतातच शेतमाल ताडपत्रीने झाकून ठेवावा लागत आहे. महागडी ताडपत्री त्यासाठी अनेकांना खरेदी करावी लागली आहे.

खानदेशात फक्त गुरुवारी दुपारपर्यंत स्थिती बरी होती. ऊनही पडले. होते परंतु दुपारनंतर पावसाळी वातावरण तयार झाले. शुक्रवारी पहाटे व सकाळी अनेक भागात १० ते १२ मिनिटे तुरळक, हलका पाऊस झाला. यानंतर पाऊस थांबला. परंतु ढगाळ वातावरण, वेगाचे वारे, अशी स्थिती कायम होती.

२६ व २७ फेब्रुवारी रोजी चोपडा, पारोळा, चाळीसगाव आदी भागात गारपीट, वादळ झाले. यासंबंधीचे पंचनामे होत नाही, तोच पुन्हा एकदा गारपीट, वादळी पावसाची समस्या तयार झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. मागील सात ते आठ दिवस खानदेशात पावसाळी स्थिती असल्याने पिकवाढीवरही परिणाम झाला आहे. कांदा, केळी, भाजीपाला पिकांत बुरशीजन्य समस्या तयार होत आहेत.

२१ हजार हेक्टरला फटका

खानदेशात २६ व २७ फेब्रुवारी रोजी अनेक भागात जोरदार पाऊस, वादळ व गारपीट झाली. २१ हजार हेक्टरला फटका बसला. एकट्या जळगाव जिल्ह्यात १८ हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली. कलिंगड, केळी, मका, गहू, ज्वारी, बाजरी व अन्य भाजीपाला पिकांची मोठी नासाडी झाली. उघड्यावरील कोरडा चाराही भिजला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com