
चांदोरी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहवालात गोदावरी नदीचे पाणी ‘गुड टू एक्सलंट’ असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात चांदोरी आणि सायखेडा परिसरातील नदीचे विदारक वास्तव काही वेगळेच चित्र उभे करत आहे.
दुर्गंधी, जलपर्णीचा विळखा आणि औद्योगिक सांडपाणी यामुळे नदीचा श्वास गुदमरू लागला आहे. अहवालातील आकडेवारी आणि नागरिकांचे अनुभव यामध्ये मोठी तफावत असल्याने आता हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.
पर्यावरणप्रेमी आक्रमक
पर्यावरण कार्यकर्ते ‘एमपीसीबी’च्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ‘गोदावरीचे पाणी स्वच्छ आहे, असे सांगण्याआधी प्रत्यक्ष नदीकिनारी येऊन पाहावे, मगच निष्कर्ष द्यावा. कागदावर पाणी स्वच्छ असल्याचा दावा करण्याऐवजी, प्रत्यक्षात परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबवायला हव्यात,’ असे सायखेडा येथील ग्रामपालिका सदस्य अशफाक शेख यांनी सांगितले.
ठोस पावले आवश्यक
गोदावरीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.
‘फक्त अहवालांमध्ये गोदावरी स्वच्छ झाली, असे दाखवून उपयोग नाही. नदी खरोखर शुद्ध आणि निर्मळ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि ठोस उपाययोजना आवश्यक आहेत.’
-विनायक खरात, सरपंच, चांदोरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.