Agriculture Irrigation : दक्षिण पुरंदरचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी

Water Storage : पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील चार जलाशय तुडुंब भरून वाहत असून वर्षभर पुरेल असा पाणीसाठा झाला आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील चार जलाशय तुडुंब भरून वाहत असून वर्षभर पुरेल असा पाणीसाठा झाला आहे. या परिसरातील उपसा सिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत येणारे पिलनवाडी, माहूर, संगम तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वडाची मळई जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून अनेक गावांच्या पाणी योजना व कृषी सिंचन योजनांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

रुद्र गंगा व केदारगंगा नद्या भरून वाहत असल्यामुळे काठावर असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीकाठच्या विहिरींच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पिलानवाडी जलाशयाची पाणी साठवण क्षमता ६७.४४ दशलक्ष घनफूट असून ६३.८२दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

या जलाशयाचा वापरावर सात गावांना पाणीपुरवठा करणारी शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच जेजुरी महावितरण ४०० केव्ही योजना अवलंबून आहेत . या जलाशयाच्या पाण्यावर ३९९ हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो.या जलाशयावर परिंचे परिसरासाठी बंद पाईपलाईन कृषी सिंचन योजना करण्यात आली असून गजानन पाणी वाटप संस्था कार्यान्वित आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Subsidy : ‘ठिबक’च्या अनुदानाचे सव्वा कोटी रुपये थकित

माहूर जलाशयाची पाणी साठवण क्षमता ८४ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६४.७२ दशरक्ष घनफूट आहे. या जलाशयावर ४३२ हेक्टर कृषी सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात असून अनेक कृषी उपसा सिंचन योजना या जलाशयावर अवलंब आहेत.

दुर्गम भागातील चार गावांना पाणी पुरवठा करणारी धनकवडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या जलाशयाच्या पाणवठ्यावर आहे. माहूरजाई पाणी वापर संस्था या जलाशयावर कार्यान्वित आहे वर्षभर पुरेल असे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : वंचित १५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : कदम

संगम जलाशय (वीर नाला) पाणी साठवण क्षमता ९०.२१ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६९.६४ दशलक्ष घनफूट आहे.या जलाशयावर कृषी उपसा जलसिंचन योजना आहेत.पांगारे परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या वडाची मळई जलाशय असून ३०.४४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून पाणी वितरण व्यवस्थेचे काम बाकी आहे.

रुद्रगंगा व केदार गंगा नद्यांच्या संगमावर वीर नाला असून सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेला जलाशय आहे. या जलाशयावरुन ३८२ हेक्टर क्षेत्रावर कृषी उपसा सिंचन योजना सुरू आहेत.रुद्रगंगा नदी मधून वाहून जाणाऱ्या पाण्यातून परिंचे, नवलेवाडी परिसरात कोरडे बंधारे भरण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com