Crop Insurance 2022 : खरिप आणि रब्बी २०२२-२३ ची विमा भरपाई आता मिळणार

Insurance Payout: खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ हंगामातील रखडलेली पीक विमा भरपाई अखेर शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने निधी मंजूर केल्याने ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News: खरिप हंगाम २०२२ आणि रब्बी हंगाम २०२२-२३ मधील विमा भरपाई रखडली होती. मात्र आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना या दोन्ही हंगामातील २ कोटी ८७ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होईल, असे कृषी विभागाने सांगितले.

राज्यात पीक विम्यासाठी ८०ः११० सुत्र लागू आहे. या सुत्रानुसार विमा कंपन्यांनी एकूण जमा विमा हप्त्याच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली असल्यास २० टक्के प्रशासकीय खर्च ठेऊन उर्वरित रक्कम शासनाला परत जमा करावी लागते. तर विमाभरपाईची रक्कम विमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ११० टक्क्यांपर्यंतचा भार विमा कंपनी उचलेली आणि ११० टक्क्यांपेक्षा जास्तचा भार विमा कंपनीने उचलायचा आहे. ११० टक्क्यांपेक्षा जास्त देय असलेली भरपाई राज्याने द्यायची असते. 

Crop Insurance
Crop Insurance Bharpai: खूशखबर, शेतकऱ्यांना २५५५ कोटी विमा भरपाईचा मार्ग अखेर मोकळा; मागच्या हंगामांमधील प्रलंबित भरपाईही मिळणार

खरिप हंगाम २०२२ आणि रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांना ११० टक्क्यांपेक्षा जास्त भरपाई देय झाली होती. ही भरपाई राज्याने देणे बंधनकारक होते. परंतु राज्य सरकारने भरपाईची रक्कम विमा कंपन्यांना दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांची ही भरपाई रखडली होती. २०२२-२३ मध्ये राज्यात पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी,

आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपनींमार्फत राबविण्यात आली होती. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : एक रुपयात पीकविमा योजना गुंडाळणार ; नवी योजना आणण्याची कृषिमंत्री कोकाटे यांची विधानसभेत घोषणा

खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ हंगामातील ८०:११० मॉडेलनुसार ११० टक्क्यांपेक्षा जास्तीची देय नुकसान भरपाई रक्कम २३१ कोटी ३० लाख रुपयांपैकी २३१ कोटी २८ लाख रुपये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात आले होते. मात्र विमा कंपनीने ११० टक्केपेक्षा जास्तीची २ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपये उपलब्ध करुन देण्याबाबत अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार राज्याने आता ही रक्कम मंजूर केली आहे. ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून संबंधित विमा कंपन्यांना मिळणार आहे. त्यानंतर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ मधील रखडलेल्या विमा भरपाईची शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत होते. पण आता शासनाने ही रक्कम मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com