
Parbhani News : परभणी जिल्ह्यात दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे झालेली नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत ४१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
२०२२ मध्ये ७७, तर २०२३ मध्ये १०३ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून आत्महत्या वाढ झाली आहे. या आत्महत्यांपैकी ५७ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. एकूण ३७ प्रकरणे अपात्र असून ९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
गेल्या वर्षभरात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे, जून, ऑगस्ट या महिन्यात प्रत्येकी ६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. एप्रिलमध्ये ८, सप्टेंबरमध्ये १२, ऑक्टोबरमध्ये १३, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी १० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत. वर्षे-दोन वर्षाआड दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जात आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे.
परभणी जिल्ह्यात २००६ ते २०२३ या १८ वर्षांतील शेतकरी आत्महत्यांची संख्या १ हजार ३३ झाली आहे. २०१९ ते २०२३ या पाच वर्षात एकूण ४१२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी २८२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. एकूण ११० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.