Banana Disease : जळगावात केळीवर करप्याचा फैलाव

Banana Sigatoka Disease : जिल्ह्यात केळी पिकात करपा (यलो सिगाटोका) रोगाचा फैलाव झाला आहे. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत असून, यात उत्पादन खर्चही वाढत आहे.
Banana Disease Management
Banana Disease ManagementAgrowon
Published on
Updated on

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः
जिल्ह्यात केळी पिकात करपा (यलो सिगाटोका) रोगाचा फैलाव झाला आहे. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत असून, यात उत्पादन खर्चही वाढत आहे. शासकीय यंत्रणा व केळी संशोधन केंद्रानुसार करपा रोगाचे प्रमाण कमी आहे. पण शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, असेही म्हटले आहे.

जिल्ह्यात पाच ते सहा महिन्यांच्या केळी बागा किंवा निसवत असलेल्या बागांत हा रोग अधिक आहे. त्याची सुरुवात ऑगस्टमध्येच झाली होती. याच काळात तो थोपविण्यासाठी कार्यवाही हवी तशी न झाल्याने हा रोग वाढत गेला. आता बागा निसवणीच्या अवस्थेत असताना तो अधिकचा नुकसानकारक ठरू लागला आहे.

केळीचे आगार असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा भागात करपा रोग केळीत दिसत आहे. त्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. या रोगामुळे केळीच्या उत्पन्नावर १० ते १२ टक्के परिणाम होवू शकतो. यातच रावेरातील तांदलवाडी, निंबोल, ऐेनपूर व इतर काही गावांत एकात्मिक व्यवस्थापनातून या रोगाला आटोक्यात आणण्याची कार्यवाहीदेखील झाली आहे. यामुळे या भागात हा रोग नसल्याही चित्र आहे.


Banana Disease Management
Banana CMV : खानदेशात केळीवर पुन्हा‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव

दोन ते चार पाने रोगग्रस्त
करपा रोगात केळीची पाने सुरुवातीला पिवळी व नंतर काळी, कोरडी होतात. या पानांद्वारे केळी झाडाला कोणतेही पोषण मिळत नाही. यामुळे झाडाची पर्यायाने घडाची वाढ कमी होते. उत्पादनावर परिणाम होतो. सध्या एका झाडावर दोन ते चार पाने रोगग्रस्त असल्याचे आढळले आहे. यासंबंधी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने जनजागृती शिबिरे घेतली असून, शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्येही पाऊस झाला. तसेच या महिन्यातही पावसाळी वातावरण आहे. आर्द्रता अधिक आहे. तसेच थंडीही आहे. यामुळे करपा रोगास अनुकूल स्थिती असून, हा रोग सतत पसरत आहे. त्याच्या उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.



करपा थंडीच्या काळात वाढला आहे. त्याची सुरुवात ऑगस्टमध्येच होते. त्याच काळात त्यावर नियंत्रण करणे आवश्यक असते. त्याचे प्रमाण कमी आहे. परंतु शेतकऱ्यांनी रोगग्रस्त पाने काढून ती बागेबाहेर काढावीत व जाळावीत.

केळीची अधिक व दाट लागवड असलेल्या भागात म्हणजेच रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात हा रोग आहे. रोगग्रस्त पाने काढताना त्यांचा स्पर्श इतर झाडांना होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच निर्देशानुसार फवारणी घ्यावी.
- चंद्रशेखर पुजारी, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com