
Jalgaon News : जिल्ह्यात पश्चिम भागासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीत मध्यंतरी प्रवाही पाणी होते. यामुळे नदीतील वाळू चोरी, उपसा बंद होता. परंतु पाऊस व नदीतील पाणी ओसरल्याने वाळूउपसा गिरणा नदीत सुरू आहे.
नदीला पाणी किंवा पूर आल्यानंतरच हा उपसा बंद असतो. गिरणा नदीकाठच्या गावांत वाळूचोरांचा उपद्रव, धुमाकूळ सुरू झाला आहे. सध्या अनेक भागात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. वाळूला मागणी असून, दरवाढ झाली आहे. चोरटे याचा लाभ घेत आहेत.
परंतु नदीत अनेक वर्षे वाळू उपसा सुरू असल्याने नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. बेसुमार वाळू उपशाने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत असल्याची स्थिती आहे.
चोरीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासन काम करीत नाही, असाही आरोप शेतकरी, ग्रामस्थ करतात. रात्रंदिवस नदीकाठच्या गावांत वाळू उपसा व वाहनांची वर्दळ असते. गिरणा नदी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यासाठी महत्त्वाची आहे.
या नदीत जळगाव, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागात वाळूची चोरी केली जाते. काही भागातून गेले 30 वर्षे वाळू उपसा सुरू आहे. याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. पण प्रशासन, लोकप्रतिनिधी या समस्येला आवर घालत नाहीत.
कानळदा सरपंचांची तक्रार
कानळदा (ता.जळगाव) येथील गिरणा नदीतूनही चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू असून, हा उपसा रोखा, अशी मागणी कानळदा येथील सरपंच पुंडलीक सपकाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. तहसीलदार यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले आहे. वडनगरी, फुपनगरी, खेडी खुर्द आदी भागात वाळू अतिउपशाने संपुष्टात आली आहे. कानळदा येथे नदीत वाळू आहे. पण त्याकडे चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याची तक्रार सपकाळे यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.