दत्तात्रेय वने
मी पिके पारंपरिक निवडली; पण त्यांच्या उत्पादनाची पद्धती पारंपरिक ठेवली नाही. त्याला सुधारित तंत्राची व पाणी व्यवस्थापनाची जोड दिली. या तत्त्वावर आधारित शेती केल्यामुळेच मला यश मिळाले आणि शेती विकासाचा शाश्वत मार्ग सापडला. माझ्या प्रयोगांची चार वैशिष्ट्ये सांगता येतील
गहू, कांदा, भुईमूग, सोयाबीन, हरभरा यांचे तुषार सिंचनाने व्यवस्थापन व काटेकोर शेती.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा समुचित वापर.
शेतीचा काटेकोर हिशेब, नफ्यातील २५ टक्के बचत, पाणी व्यवस्थापन व कृषी अर्थशास्त्रावर फोकस.
कुटुंब व शेतीचे स्वतंत्र अर्थशास्त्र, आर्थिक बचत. शेतकऱ्यांचे गट, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून विस्तार कार्य.
नगरचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांनी २००७ मध्ये शाश्वत शेतीचे अभियान सुरू केले. तालुका स्तरावर कार्यशाळा घेतल्या. मला उमजलले शेतीतील शास्त्र मी शेतकऱ्यांना सांगू लागलो.
त्याच्या जोडीला ‘ॲग्रोवन’मधील लेखन आणि शेतीतील पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांमधील मुलाखती आणि समाज माध्यमातून डॉ. वने मॉडेल सर्वदूर विस्तारले.
अनेक शेतकरी या मॉडेलचे अनुकरण करू लागले. संदीप घोले (दौंड, जि. पुणे), विजय देशमुख (नेवासा, जि. नगर), चंद्रकांत देशमुख (परभणी), नरेश नेवाळ (जळगाव), नितीन ढुस (देवळाली प्रवरा), संग्राम धुमाळ (तांदूळवाडी, जि. नगर) अशी कितीतरी नावे सांगता येतील. ‘ॲग्रोवन’चे प्रभावी माध्यम हाताशी असल्यामुळेच मी राज्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो. त्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकलव्याप्रमाणे साधना केली. माहिती आणि ज्ञानाचा प्रसार होत गेला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.