
Nashik Rain News : नाशिक जिल्ह्यात पावसाचा प्रकोप कायम असून शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका बसत आहे. रविवारी (ता. ७) रोजी सायंकाळी सहा वाजेनंतर कळवण व देवळा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे.
त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा हंगाम प्रभावित झाला आहे. नुकसान वाढते असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या ज्यामध्ये कळवण तालुक्यातील बगडू, भेंडी यासह देवळा तालुक्यातील बहुर विठेवाडी खामखेडा परिसरात पावसाने दणका दिला आहे.
त्यामुळे या भागातील प्रामुख्याने टोमॅटो, हिरवी मिरची, कोथींबीर, कोबी, फ्लॉवर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी साठवलेल्या कांद्याच्या पोळीमध्ये पाणी गेल्याने तो भिजल्याने नुकसान वाढतेच आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने पावसाळ्याची स्थिती पाहायला मिळाली.
पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत असून यात वीटभट्टी मालक यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांप्रमाणे शासनाने आम्हाला देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता वीटभट्टी चालक करत आहे.
अवकाळी पावसामुळे वीटभट्टीवरील कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी लावलेल्या भट्ट्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत. वीट निर्मितीसाठी आजही पारंपरिक पद्धत वापरली जाते. कच्ची
मातीची साच्यात बनवलेली वीट दगडी कोळशाची भट्टी लावून भाजली जाते. त्यानंतर भट्टीतून तयार टणक वीट बांधकामासाठी वापरली जाते.कसमादे भागात अनेक वीटभट्टींवर पावसाने अवकृपा केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.