
Jalgaon News : जळगाव : चाळीसगाव (जि.जळगाव) नजीकच्या गिरणा नदीवरील गि
रणा धरणातून टंचाई निवारण्यासह उद्योगांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. कानळदापर्यंत (ता.जळगाव) पाणी पोचल्यानंतर आवर्तन बंद केले जात असून, या पाण्याचा लाभ नदीकाठच्या गावांना तसेच परिसराला होत आहे.
गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल व धरणगाव या भागात गिरणाच्या पाटचाऱ्या आहेत. मागील वर्षी धरण फक्त ५६ टक्के भरल्याने त्यातून रब्बीसाठी आवर्तन देण्यात आले नाही.
फक्त पिण्यासाठी किंवा टंचाई दूर करण्यासाठी धरणातून पाणी दिले जात होते. यात दोन वेळेस उद्योगांसाठी पाणी दिले होते. टंचाई दूर करण्यासाठी नदीत तीन आवर्तन सोडण्यात आले. यंदा मात्र धरण १०० टक्के भरले होते. यातून रब्बीसही पाणी दिले जात आहे. तसेच
नदीत नुकतेच टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्यात आले.
धरणातून पाणी सोडल्यानंतर सुमारे सहा ते सात दिवसात ते कानळदापर्यंत पोचते. कानळदा गावानजीक नदीत पाणी पोचल्यानंतर आवर्तन बंद करण्यात येते. कानळदा गावाच्या पुढे तापी नदीचे स्रोत उपलब्ध होतात. यामुळे फक्त कानळदापर्यंत हे पाणी दिले जाते. परंतु कानळदापर्यंत पाणी पोचल्यानंतर किमान दोन दिवस पाणी नदीत प्रवाही असले पाहिजे, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पाण्यासंबंधीचे स्रोत बळकट होण्यास मदत
धरणातून दोन हजार क्यूसेस वेगाने हे पाणी सोडण्यात आले होते. चाळीसगाव शहरासह भडगाव, पाचोरा येथील पिण्याच्या पाण्यासाठी या आवर्तनाचा लाभ होत आहे. तसेच नदीवरील दहिगाव, दापोरा येथील बंधाऱ्यातही पाणी आले. नदीकाठी सुमारे १४० गावांमधील शिवारासह पिण्याच्या पाण्यासंबंधीचे स्रोत यामुळे बळकट होतील किंवा त्यांना पाण्याचा स्रोत मिळेल, अशी माहिती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.