
Akola News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ५ मेगावॅट क्षमता असलेला पातूर तालुक्यातील चान्नी येथील जिल्ह्यातील चौथा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे ३३ केव्ही चान्नी उपकेंद्राअंतर्गत १ हजार ७४६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. तथापि ३३ केव्ही चान्नी उपकेंद्रासाठी ३ जानेवारी २०२५ ला ३ मेगावॅट क्षमता असलेला पांगरा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे त्या प्रकल्पातून ४८० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करण्यात झाली आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा,अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात विकेंद्रीत सौर प्रकल्पातून २०४ मेगावॅट वीज निर्मित करण्यात येणार आहे.
तथापि जिल्ह्यात काही कालावधीतच बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद (३ मेगावॅट), मूर्तीजापूर तालुक्यातील माना (२ मेगावॅट), णि पातुर तालुक्यातील पांगरा (३ मेगावॅट) आणि चान्नी (५ मेगावॅट) असे एकुण १३ मेगावॅट क्षमता असलेले चार सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ७४२ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
पातुर तालुक्यातील चान्नी हा सौर प्रकल्प ५ मेगावॅट क्षमतेचा असून २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. तसेच १५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला पांगरा येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा आहे.या दोन्ही सौरप्रकल्पातून निर्माण होणारा वीज पुरवठा ३३ केव्ही चान्नी उपकेंद्राला करण्यात आला आहे.
परिणामी ३३ केव्ही चान्नी उपकेंद्राअंतर्गत चान्नी सिंगल फेज, उमरा सिंगल फेज, ११ केव्ही मळसूर आणि ११ केव्ही पिंपळखुटा या कृषी वाहिनीवरील सतरा पेक्षा जास्त गावांतील २ हजारांवर शेतकऱ्यांना आता दिवसा, भरवशाचा वीजपुरवठा होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.