K Chandrasekhar Rao : केसीआर यांचा तेलंगणातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या दुर्दशेला धरले जबाबदार

Congress government in Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस नेते के चंद्रशेखर राव यांनी रविवारी तेलंगणातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरून सत्ताधारी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तर शेतकऱ्यांची झालेली ही दुर्दशा फक्त सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याचा आरोप केसीआर यांनी केला आहे.
K Chandrasekhar Rao
K Chandrasekhar RaoAgrowon

Pune News : देशातील शेतकऱ्यांच्या अवस्थेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतूरा रंगला आहे. यादरम्यान तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस नेते के चंद्रशेखर राव यांनी रविवारी तेलंगणातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरून सत्ताधारी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर आरोप करताना, 'शेतकऱ्यांची ही अवस्था फक्त सत्ताधारी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे', अशी टीका केली आहे. केसीआर यांनी ही टीका रविवारी (ता.३१) तेलंगणातील सूर्यापेट येथे शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान केली. 

शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान केसीआर म्हणाले की, 'राज्यात पाण्याची टंचाई असून दुष्काळामुळे अनेक एकरांवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील  काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याच्याआधी आपले राज्य धान उत्पादनात पहिल्या क्रमांकावर होते. पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज ते कुठे पोहोचले आहे?', असे केसीआर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच केसीआर यांनी, १०० दिवसात राज्यात २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला. 

K Chandrasekhar Rao
K. Chandrasekhar Rao : जनता सोन्याच्या विटा नाही, पाणी मागतेय; के. चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्र सरकारवर घणाघात

केसीआर म्हणाले की, 'महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दोषारोप आणि लक्ष विचलित करण्याचा खेळ काँग्रेस करत आहे. तर पाणी आणि विजेच्या सुविधेअभावी शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे १५ लाख एकर पिके सुकत आहेत'.

K Chandrasekhar Rao
K. Chandrshekhar Rao : तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव खरंच शेती करणार? ; व्हायरल ऑडिओ कॉलमुळे रंगली चर्चा

'मिळालेल्या माहितीनुसार, १०० दिवसांत २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील काहींचा मृत्यू हा  विजेचा धक्का लागून झाला आहे. तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे होत आहेत. पण राज्यात असे होईल असे आम्हाला वाटले नव्हते', असेही केसीआर म्हणाले. 

पुढे केसीआर म्हणाले, 'राज्यात सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून काँग्रेस सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. पण आम्ही विरोधी पक्ष म्हणून हारलेलो नाही. आमचे ३९ आमदार आहेत. सत्ताधारी एक किंवा दोन आमदारांना आमिष दाखवू शकतात.

पण तुम्ही आत्महत्या करू नका. आम्ही (भारत राष्ट्र समिती) आपल्या मागे खंबीर उभे आहोत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ही आमची जबाबदारी आहे. विरोधक म्हणून आम्हाला नवीन सरकारला वेळ द्यायचा होता. मात्र राज्यातील भीषण परिस्थितीमुळे काँग्रेसने आपले अपयश अधोरेखित करण्यास भाग पाडले', असा टोला केसीआर यांनी लगावला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com