
Sangli News : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. चाऱ्याची ३ हजार ५८७ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र पाणीटंचाईमुळे तासगाव, खानापूर या तालुक्यास चारा पिकाची लागवड कमी झाली आहे. चाऱ्याचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता असल्याचे अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी उपलब्ध झाल्याने या तीन तालुक्यांत चारा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
गतवर्षी चाराटंचाई भासल्याने चारा पिकाची लागवड केली आहे. गतवर्षी उन्हाळी हंगामात ४ हजार ५१९ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाच्या उन्हाळी हंगामात ३ हजार ५८७ हेक्टरवर चारा पिकाची लागवड केली आहे.
आटपाडी तालुक्यातील टेंभू योजनेचे पाणी सर्वत्र पोहोचले आहे. त्यामुळे या तालुक्यात चारा पिकाची लागवड सर्वाधिक झाली आहे. जत तालुक्यातही चारा पिकाची त्याखालोखाल लागवड झाली आहे. मका पिकांबरोबर कडवळ, इतर चारा पिकांची लागवड केली आहे.
यंदा दुष्काळी भागामध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याने चारा पिकांच्या लागवडीत घट होण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे. तसेच चारा पिकांना पाण्याची कमतरता भासू लागल्याने पिकांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
तालुकानिहाय चारा पिकाची लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज ६८
जत ५३०
खानापूर ९०
वाळवा ७०
तासगाव २५
शिराळा ६८
आटपाडी २२४७
कवठेमहांकाळ ४२२
पलूस ७५
एकूण ३५८७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.