CM Eknath Shinde : राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा

Politics Update: सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत आम्ही शेतकरीकेंद्रित ठेवून अनेक निर्णय घेतले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत आम्ही शेतकरीकेंद्रित ठेवून अनेक निर्णय घेतले. एक रुपयात पीकविमा, मोफत वीज, नमो शेतकरी महासन्मान योजना, सरकार आपल्या दारी योजना अशा अनेक योजना राबवून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले. म्हणूनच आम्ही धाडसाने कार्यअहवाल काढू शकलो, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत केला.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत सरकारच्या कामांमुळे विरोधक धास्तावले असल्याची टीका केली. वानखेडे स्टेडिअममध्ये झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राज्य सरकारने केलेल्या अडीच वर्षांच्या कामांचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले. यामध्येही महाविकास आघाडी सरकारच्या कामाची तुलना केली.

CM Eknath Shinde
Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपये बोनस मिळवून देऊ, फडणवीसांची ग्वाही

ज्यांचे गृहमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करणे हास्यास्पद असल्याची टीका फडणवीस यांनी केली. तसेच कोरोना काळात आरोपी सुखरूप घरी पोहोचले पाहिजेत यासाठी वाहनांची व्यवस्था करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असेही ते म्हणाले.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : राज्याच्या विकास, कल्याणासाठी भीमाशंकराला साकडे : मुख्यमंत्री शिंदे

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांतील महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकारच्या कामाची तुलना केली तर त्यांच्या नावावर अनेक वर्षांमध्ये सगळे प्रकल्प बंद पाडण्याचे पाप जाईल.

राज्यातील उद्योग कुणीही पळवले नाहीत मात्र, केवळ गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचे काम सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले. एक रुपयांत पीकविमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, मोफत वीज अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकरी सशक्त करण्याचा प्रयत्न केला. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे आम्ही या योजना राबविल्या आहेत.

अजित पवार म्हणाले, की निवडणुका आल्या की नेहमी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले जातात. आधी का निर्णय घेतले जात नाहीत याला अर्थ नाही. विरोधकांनी आरोप करताना तारतम्य ठेवण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com