
Amravati News : हमीभावाऐवजी (MSP) शेतकऱ्यांना भावाची हमी मिळावी शेतकरी संघटनेची भूमिका असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केले.
कापसावरील वायदेबंदीचा (Cotton Futures Ban) निर्णय मागे घेण्यासाठी शासनाला बाध्य केल्याबद्दल ललित बहाळे तसेच दिलीप ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉनमध्ये बुधवारी (ता. ८) रात्री हा कार्यक्रम पार पाडला. शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी व शेतकरी या वेळी उपस्थित होते.
ललित बहाळे पुढे म्हणाले, ‘‘शेतीमालाला दर (Agriculture Produce Rate) देण्यासाठी किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) असा शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे. शेतीमालाचे दर हे कमीत कमी असावेत असे यातून स्पष्ट होते.
दुसरीकडे कंपन्यांद्वारे उत्पादित होणाऱ्या विविध वस्तूंवर मात्र कमाल (मॅक्झिमम) किरकोळ विक्री दर अशी व्याख्या वापरली गेली आहे. यातूनच शेतीमालाप्रति सरकारचे धोरण अभिप्रेत होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाऐवजी आता भावाची आम्ही मिळावी यासाठी आंदोलन उभे करण्याची गरज आहे. या मुद्द्यावर शेतकरी संघटना आपला लढा सातत्याने सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाला खऱ्या अर्थाने शेतकरी हीत जपायचे असेल तर शेतीवरील कायदेशीर बंधने दूर केली पाहिजे. सोबतच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे या बाबीचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला.
अशा प्रकारची बंधने असतील तर सरकारला अपेक्षित आत्मनिर्भरता शेतकऱ्यांच्या बाबतीत शक्य होणार नाही. सरकारकडून सध्या अनेक बंधन शेती क्षेत्रावर लादली जात आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.