Crop Loss Survey : पुढच्या आठवड्याभरात नुकसानीचा प्राथमिक आढावा घेऊन पंचनाम्यानंतर तातडीची मदत शेतकऱ्यांना करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.१९) दिली आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. .मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, "राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड पडल्याने पिकांचं नुकसान होत आहे. तर अनेक ठिकाणी उतारा कमी येईल, अशी परिस्थिती आहे. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी चर्चा करून आपापल्या जिल्ह्यांत आढावा घेण्यासाठी निर्देश दिले आहेत. पुढच्या आठवड्याभरात प्राथमिक आढावा घेऊ. त्यानंतर पंचनामे करून तातडीची मदत जाहीर करू." असंही त्यांनी स्पष्ट केलं..अतिरिक्त वीज पुरवठा यावेळी जनावरांचा चारा आणि पाणी टंचाईसह शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी आहे, त्या शेतकऱ्यांना पिकं वाचवता येतील, यासाठी अतिरिक्त वीजपुरवठा करण्यात येत आहे. संध्याकाळच्या वेळी शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज मिळावी यासाठी तजवीज केली असून सर्वच भागांत जास्तीची वीज देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं..तसेच काही ठिकाणी सिंगल फेजमुळे वीज दिली जात नव्हती, त्या ठिकाणी वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांना किमान काही ना काही दिलासा देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे..Monsoon Update : सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची तूट.विरोधकांनी राजकारण करू नयेराज्यातील पावसाचा खंड लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना राजकारणाची वाईट सवय लागल्याची टीका केली. तसेच दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहनही केले..दुष्काळाच्या संदर्भातील शासन निर्णय विरोधकांच्या काळातही तेच होते. त्या शासन निर्णयाप्रमाणे कधी काय करायचं याचे नियम आहेत. त्याचं पालन केलं तरच एनडीआरएफचे पैसे मिळतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले..एकीकडे एनडीआरएफच्या नियमांचं पालन करत आहोत. परंतु दुसरीकडे न थांबता राज्य सरकारच्या वतीने मदत करतो. त्यानंतर एनडीआरएफच्या नियमानुसार दावा करतो. हे जूनचे आदेश असून नवीन नाहीत. विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची वाईट सवय लागली आहे. त्यामुळे केवळ राजकारण करणं यावर योग्य नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले..केंद्र सरकारला प्रस्तावदुष्काळाच्या मदतीसाठी राज्य सरकार केंद्राला प्रस्ताव पाठवणार असून त्याचे प्रस्ताव ५ ऑक्टोबरनंतरच्या पंचनाम्यानुसार द्यावे लागतील, असा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारच्या संसाधनातून मदत करते. त्यानंतर केंद्राची मदत घेऊन राज्य सरकारने केलेल्या संसाधनाचे पैसे परत करते, असंही त्यांनी स्पष्ट केलं..काजू-बदाम प्रकरणमुख्यमंत्र्यांनी काजू-बदाम खाण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राज्यात प्रशासनकडून या बैठकात काजू-बदाम आणून ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे दुष्काळ आहे, म्हणून जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जातात, असं म्हणणं योग्य नाही. पण प्रशासनाने थोडी संवेदनशीलता ठेवली पाहिजे, असेही म्हणत प्रशासनाचे कानही मुख्यमंत्री टोचले..Monsoon Rainfall Deficit : यंदाचा मॉन्सून २००९ नंतरचा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता; पावसाची तूट १५ टक्क्यांवर.दरम्यान, दुष्काळ आढावा बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार संजय जाधव यांच्यासमोर खाण्यासाठी काजू बदाम ठेवण्यात आल्याच्या प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. या प्रकरणावरून राज्य सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही, या चर्चेला उधाण आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.