Pune News: राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. ७) माळशिरस तालुक्यातील पालू गावात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील भाजपमध्ये प्रवेश करताना आयोजित कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले, शेतकरी सोसायटी काढतात, कर्ज घेतात आणि मग कर्जबाजारी होऊन पुन्हा कर्जमाफी मागतात. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, हे विधान शेतकऱ्यांची थट्टा करणारे असल्याचे मत व्यक्त होत आहे..राज्यात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांतील पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे वाढले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा सरकारकडे कर्जमाफीची मागणी करत आहेत. परंतु अशा कठीण काळात नेत्यांकडून करण्यात आलेली वादग्रस्त विधाने शेतकऱ्यांना दुखावणारी ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फुकट कसं मिळेल? असे विधान करून शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतला होता. आता विखे पाटील यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमधील नाराजी आणखी वाढली आहे..Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध.विखे पाटलांचे स्पष्टीकरण आणि आश्वासनया कार्यक्रमात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका केल्यानंतर, विखे पाटलांना आपली चूक लक्षात आली. शेतकऱ्यांमध्ये पसरणारी नाराजी आणि राजकीय टीका अधिक वाढू नये म्हणून विखे पाटलांनी नंतर लगेचच परिस्थिती लक्षात घेऊन स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, महायुती सरकार शेतकऱ्यांना नक्की कर्जमाफी देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तसेच, त्यांनी पुढे सांगितल की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे आमच सरकार शंभर टक्के कर्जमाफी करणार आहे..Ajit Pawar: तुम्हाला वेळ नसेल तर खुर्ची काढून घेऊ: अजित पवार.ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता काम थांबवू नये. उद्याच्या तरुण पिढीसाठी आणि भविष्यासाठी उद्योग उभे करणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या कर्जमाफीवरील वक्तव्यावर सामाजिक माध्यमांवर आणि शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी हे वादग्रस्त वक्तव्याचे नुकसान भरून काढण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण असल्याची टीका केली. तर काही शेतकऱ्यांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारे असल्याचा आरोप केला आहे..उद्धव ठाकरेंवरही टीकादरम्यान, कार्यक्रमावेळी विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, कोविडच्या काळात उद्धव ठाकरे माझ कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत लोकांना वाऱ्यावर सोडून घरात बसले होते, आणि आता ते मराठवाड्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत आहेत. असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.