
Yavatmal News : मागील शेती हंगामामध्ये राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी केल्या, कंपनीचे प्रतिनिधी आले, प्रतिनिधींनी शेतीमालाचे नुकसान झाल्याचे मान्य केले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाने मोठा गाजावाजा करून एक रुपयामध्ये पीकविमा उपलब्ध करून दिला. पण, हे सरकार पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना पुढाकार घेताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये तर पीक विम्याचे पैसे दिले नाही, म्हणून जिल्हाधिकारी यांनी कंपनीला दंडही ठोकला होता. तरीही कंपनीला त्याचा फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.
जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. शेतांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतरही शेतकऱ्याचे नुकसान हे मोठे होते. कारण पाऊसच तेवढ्या मोठ्या प्रमाणात पडला होता. पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी केल्या.
तक्रारी केल्यावर पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसान पहावयासाठी शेतात आले. त्यांनी नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना एक फॉर्म भरून तुमचे इतके नुकसान झाले, असे फॉर्मवर लेखी दिले. ही सर्व प्रक्रिया जुलैमध्ये झाली.
आज सहा महिने होत आहेत तरी अजूनही पीकविमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे मान्य केले तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी इतका वेळ का, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.