
Chhatrapati Sambhaji Nagar News : बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाची हमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी यावी यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीला चालना दिली असून, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले.
‘बांबू लागवड’ या विषयावर मंगळवारी (ता. २२) तापडीया नाट्यगृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास बांबू वृक्ष लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपायुक्त रोहयो डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपस्थित होते. प्रारंभी बांबू लागवड क्षेत्रातील तज्ज्ञ संजीव करपे यांनी उपस्थितांना बांबू लागवड, बाजारपेठ, उत्पादन, उपयोग यावर संजीव करपे यांनी सविस्तर सादरीकरण व मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत बांबू वृक्ष लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल यांनीही शेतकऱ्यांना बांबूपासून तयार होणारी विविध उत्पादने, बांबूचे विविध क्षेत्रांतील उपयोग, त्याचे अर्थकारण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
पालकमंत्री भुमरे म्हणाले, की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता येईल. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल, असेही भुमरे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.