
Nashik News : कांदा, मिरची आणि टोमॅटो पीक यंदा आर्थिकदृष्ट्या तोट्यात आले. मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपीट व संततधारेमुळे सातत्याने नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांनी आता पीक बदल करत कोबी पिकाचा पर्याय निवडला आहे. कळवण तालुक्यात यावर्षी ४०० ते ५०० एकर क्षेत्रावर कोबीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीत वाढ झाली आहे.
गत वर्षी सुरुवातीला कोबीला १५ ते २३ रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे झाले होते. परंतु काही शेतकऱ्यांनी शेवटी कवडीमोल भावाने विकली होती. गेल्या वर्षभरापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. परिणामी कांदा लागवड उशिराने झाली.
पुढे तापमान वाढ व काढणी अवस्थेत मॉन्सूनपूर्व पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यातच यंदा कांदा खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मिरची लागवडीदेखील कमी बाजारभाव व पावसामुळे अडचणीत सापडल्या. टोमॅटो पिकातील शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या; मात्र पावसामुळे लागवडी अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोबी पिकाला पसंती दिली आहे.
वातावरण स्थिती तसेच पाऊस यांचा विचार करून सुधारित पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला आहे. या भागातील उत्पादित शेतमाल प्रामुख्याने गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा तर राज्यात मुंबई, मालेगाव, जळगाव व नाशिक बाजारात जातो. तर बहुतांश व्यापारी हे थेट बांधावर खरेदीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना पीक काढणी व विक्रीचा सोपा पर्याय आहे.
एकरी एक लाख खर्च
साधारण ४५ ते ६० दिवसांचे पीक असलेल्या कोबीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० हजारांपासून तर १ लाख रुपये खर्च येतो. एका एकरमध्ये २० टन कोबीचे उत्पादन मिळते;मात्र हे पीक मेहनतीचे आहे.\
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.