Nanded News : सोयाबीनवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोहा, कंधारसह पाच तालुक्यांतील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
या बाबत जिल्हा प्रशासनाने भरपाईपोटी ७९ कोटी ६३ लाखांची मागणी शासनाकडे केली खरी परंतु ही भरपाई अद्याप मंजूर झाली नसल्याने लोहा, कंधार मधील शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनवर यंदा यलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज व मुळकूज या बुरशीजन्य रोगांची बाधा झाली होती. परिणामी उत्पादनात चाळीस ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज कृषी विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
या बाबत शासनाने पंचनामे करुन नुकसानीचे क्षेत्र करण्याचे निर्देश दिले होते. या बाबत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार संयुक्त यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्यानुसार, जिल्ह्यातील ४७८ गावातील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाल्याचे दिसून आले होते. यात नांदेडमधील कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यांतील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोचल्याचा अहवाल शासनाला पाठविला होता.
यात शेतकऱ्यांना भरपाईसाठी ७९ कोटी ६३ लाखांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. ही मागणी करुन तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी संपला परंतु या शासनाकडून मात्र अद्याप दमडीची मदत मिळाली नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.