Agriculture Department : जालन्याच्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयात मांडलं गाऱ्हाणं

Farmers Problem : कृषी विभागाच्या काही चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त असल्याचे नमूद करत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयात जाऊन आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Jalna News : कृषी विभागाच्या काही चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त असल्याचे नमूद करत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयात जाऊन आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.

शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, २०२४ मृग बहार फळ पीक विम्याचे ज्या पद्धतीने ट्रिगर बसले त्याप्रमाणे लवकरात लवकर विम्या पोटी येणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, २०२३ मधील रब्बी आंबिया बहर फळपीक विम्याचे संपूर्ण जिल्ह्यात बसलेल्या ट्रिगर प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी,

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाचे संकेतस्थळ तत्काळ करा सुरू

२०२४ खरीपमध्ये संपूर्ण जिल्ह्यात विम्याचा भरणा व नुकसानापोटी अग्रिम विम्यासाठी येणाऱ्या तक्रारी व त्यातून मंजूर तसेच नामंजूर तक्रारीची कारणे, पीक कापणी प्रयोगात मिळालेल्या तक्रारी किती व आजपर्यंत अग्रिम रक्कम का मिळाली नाही याचे लेखी उत्तर द्यावे, जिल्ह्यातील भुसार मालाच्या व कापूस, सोयाबीन याकरिता विम्यापोटी येणार शासकीय अग्रिम अनुदान देण्याचे निकष काय आहेत ते लेखी द्यावे,

२०२४ मधील १ व २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली, त्यानंतर मोसंबी फळाच ७० टक्के नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे कृषी विभागाने फळगळ करता काही आर्थिक तरतूद केली का याचे स्पष्टीकरण द्यावे, जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अहवालानुसार डाळिंब, द्राक्ष, मोसंबी व अन्य फळपीक लागवड क्षेत्र, विमा भरणा क्षेत्र व पिकानुसार हेक्टरी वाटप क्षेत्र व अंतिम मंजूर प्रमाणे झालेली वाटप याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे,

२०२२-२३ आंबिया बहर हंगामातील कृषी विभागाने व कंपनीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन झाडांची पाहणी करून मंजूर केलेल्या अर्जांची संख्या व जीओ टॅगिंगचे फोटो व प्रत्यक्ष पाहणी अहवाल द्यावा, एका हंगामात किंवा वर्षात किती वेळा कृषी पीकविम्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे व किती वेळा आपल्या विभागांनी केले त्याचा लेखी अहवाल द्यावा,

Agriculture Department
Agriculture Department : अधिकारी, शास्त्रज्ञांकडून विविध पिकांची पाहणी

प्रत्येक मंडळातील पर्जन्यमापकाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण हे प्रत्येक हंगामात केले जाते का, केले जात असेल तर संबंधित मापक ज्या ग्रामपंचायत किंवा सजाच्या ठिकाणीं आहे त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण वेळी ग्रामपंचायत व सज्जातील शेतकरी यांचा ठराव किंवा प्रतिक्रिया ज्या मिळाल्या आहेत त्या देण्यात याव्या आदीं मागण्या शेतकऱ्यांनी केली आहेत.

निवेदन देतेवेळी शेतकरी गजानन रामनाथ उगले, गजानन प्रल्हाद देवडकर, महेश बोबडे, उद्धव लोंढे, साईनाथ करमाळे, सुभाष बागल, ज्ञानेश्‍वर मोटे, विष्णू जाधव, अतुल घोगरे आदींची उपस्थिती होती. आठवडाभरात मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास न्यायोचित मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com