

Buldana News : देऊळगावराजा तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचनाची समस्या निर्माण होत असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना केली जावी. खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी लघू प्रकल्पांमध्ये सोडले जावे, या मागणीसाठी शासनाला दिलेली मुदत संपल्याने रविवार (ता. १५) पासून शिवणी आरमाळ येथे शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
शासनाचे पुरस्कार विजेते शेतकरी कैलास नागरे यांच्यासह इतर शेतकरी यात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या काळात निवेदन देत प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा, शिवणी आरमळ, धोत्रा नंदई, सुरा, नागनगाव, पाडळी शिंदे, सावखेड नागरे, मेंडगाव, बायगाव, गुंजाळा, आसोला, सेवानगर आदी भागाला धरण उशाशी असताना देखील पाणी मिळत नाही.
अंढेरा येथील रामेश्वर लघू प्रकल्प तसेच गुंजाळा परिसरातील असोला, अंढेरा, गुंजाळा लघू प्रकल्प, मेंडगाव परिसरातील लघू प्रकल्प, शिवणी आरमाळ शिवारातील शिवणी आरमाळ लघू प्रकल्पांमध्ये खडकपूर्णा धरणातून नदीत सोडले जाणारे अतिरिक्त पाणी वळवले जावे, अशी मागणी आहे.
हे पाणी डाव्या बाजूच्या कालव्यात जात नसल्याने या भागातील शेकडो शेतकऱ्यांची शेती सिंचनापासून वंचित राहत आहे.
या परिसरासाठी कोणतीही योजना राबवा व पाणी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी कैलास नागरे, उमेश आरमाळ, रामप्रसाद पन्हाड, दत्ता नागरे, परमेश्वर सोनुने, गणेश आरमाळ, विशाल वायाळ, आनंदा कायंदे, सचिन सोनुने, सुनील पवार, गजानन आरमाळ, पंढरी आरमाळ, दीपक राठोड, योगेश आरमाळ आदी शेतकऱ्यांनी केलेली असून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.