
Nashik News : नाशिक ः कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवण्याची वेळ आली आहे.
माळमाथा परिसरात कापूस, कांदा, मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा ,कपाशी लागवडीकडे कल असतो. कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्यांचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात. भांडवल खर्च गृहीत धरता दोन-तीन वर्षापासून दहा हजार रुपये प्रति क्विंटल दरांची अपेक्षा असते. मात्र कापसाला नेहमीप्रमाणे दर कमी मिळतो. सध्या साधारणतः ६००० ते ७००० प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दराच्या प्रतीक्षेत घरात साठवून ठेवत आहेत.
मजुरांचे स्थलांतर
माळमाथा परिसरातील अनेक गावातील शेतमजुरांनी ऊस तोडणीच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नाही. मिळेल त्या गावांतून वाहनांद्वारे मजूर कापूस वेचणीसह कांदा लागवडीसाठी आणावे लागतात. शेतातील कामापेक्षा वाहतुकीचा जास्त वेळ व पैसा खर्च होत आहे.
कांदा उत्पादक अडचणीत
कापसाची साठवणूक एक वेळ शक्य आहे. मात्र लाल कांदा हा साठवणीस योग्य नसल्याने विक्रीसाठी बाजाराची वाट धरावी लागते. मात्र कांद्याचे दर या आठवड्यात २ हजाराच्या आत असल्याने शेतकऱ्यांना तो कांदा विक्री केल्याशिवाय पर्याय नसतो. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने त्याचा फटका कांदा व कापूस उत्पादनावर झाला आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे रब्बी हंगामात खते बी बियाणे खरेदीसाठी हातात पैसे शिल्लक नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. पण त्याला प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.