Advance Crop Insurance : वाशीम जिल्ह्याला अग्रिम भरपाईची हुलकावणी

Crop Insurance : पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनाला मोठी झळ बसली. जिल्हास्तरीय समितीने पीकविम्याची अग्रिम २५ टक्के भरपाई देण्याबाबत कंपनीला निर्देशही दिले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Washim News : पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनाला मोठी झळ बसली. जिल्हास्तरीय समितीने पीकविम्याची अग्रिम २५ टक्के भरपाई देण्याबाबत कंपनीला निर्देशही दिले. मात्र, विविध कारणे पुढे करीत याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. राज्यातील इतर जिल्ह्यात अग्रिमची १७०० कोटींची भरपाई दिली जाणार असल्याचे जाहीर होताच या जिल्ह्यात शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. विमा कंपनीच्या कारभाराबाबत थेट आरोप केले जात आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. २० दिवसांपेक्षा अधिक खंड पडला. गरजेच्या काळात सलग पाऊस न आल्याने उत्पादन घटले. जिल्ह्यातील ४६ महसूल मंडलांमध्ये नुकसान झाले आहे.

त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेच्या नियमानुसार नुकसानाची भरपाई म्हणून २५ टक्के अग्रिम मदत देण्याची तरतूद आहे. मध्यंतरी केलेल्या सर्वेक्षणातही नुकसानीची बाब समोर आली होती.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विमा परताव्यासाठी वेंगुर्ल्यातील शेतकऱ्यांचे उपोषण

हे पाहता जिल्हास्तरीय समितीने २५ टक्के अग्रिम देण्याबाबत अधिसूचना काढली. मात्र, विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल केले. राज्यस्तरीय तांत्रिक समितीनेही अग्रिम तातडीने देण्याचे निर्देश कंपनीला दिलेले आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

मात्र, तरीही कंपनी याबाबत काहीही निर्णय घ्यायला तयार नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करू लागले आहेत. वाशीम जिल्ह्यात कंपनीकडून पीक कापणी प्रयोगांचा डेटा मागण्यात आलेला आहे. इतर जिल्ह्यात अग्रिम देताना अशा पद्धतीने पीक कापणीचा डेटा निकष लावला काय, असा शेतकरी करीत आहेत.

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कृषी सचिवांनी जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेत पीकविमा कंपनीने २५ टक्के अग्रीम भरपाई दिली पाहिजे, असा निकाल दिला. मात्र, कंपनी मानायला तयार दिसत नाही. पीकविमा कंपनी ही कोणाच्या भरवशावर मुजोरी करीत आहे. त्यांना मोठा वरदहस्त असला पाहिजे. त्यामुळेच संपूर्ण जिल्हा वंचित ठेवण्याचे पाप केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असल्याने संकट वाढलेले आहे. खरेतर तातडीने पीकविमा द्यायला हवा होता.
-आमदार अमित झनक, वाशीम
वाशीम जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. एकरी दीड-दोन पोत्यांचा उतारा शेतकऱ्यांना आलेला आहे. तरीही कंपनी ताबडतोब अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास टाळाटाळ करीत आहे. अशा संकटाच्या काळात भरपाई मिळत नसेल तर अशा पीकविम्याचा शेतकऱ्यांसाठी फायदा तरी काय, कंपनी शेतकऱ्यांना मदत मग कुठल्या परिस्थितीत देणार.
- बेबीताई वसंता इंगोले, जिल्हा परिषद सदस्या, वाशीम
या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट संपूर्ण कोरडा गेला. ऐन पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये खंड पडल्यामुळे फुले करपून गेली. ज्या शेंगा तयार झाल्या त्यात परत दाणे भरण्याच्या अवस्थेत प्रचंड धुके पडल्याने दाणे भरले नाहीत. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. ही वस्तुस्थिती असतानाही विमा कंपन्यांचे पळवाटीचे धोरण शेतकऱ्यांसाठी योग्य नाही. तेव्हा शासनाने या अन्यायकारक गोष्टीचा विचार करावा. जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा.
-डॉ. गजानन ढवळे, शेतकरी, शिरपूर जैन, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com