Farmers Protest: शेतकऱ्यांनी मांडल्या कर्जासाठी बँकेच्या अडवणुकीच्या व्यथा
Yavatmal News: डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळपासून सुरू झालेली ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांची सातबारा कोरा पदयात्रा मंगळवारी (ता. ८) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात दाखल झाली. या वेळी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग या पदयात्रेत होता. काही शेतकऱ्यांनी बॅंकेच्या अडेलतट्टू धोरणाची कैफियत या वेळी यात्रेत मांडली.
त्याचे निराकरण यात्रेतूनच बच्चू कडू यांनी केले.राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील या संदर्भाने कोणत्याच हालचाली शासनस्तरावर नाहीत. याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवसुलीवर देखील झाला आहे.
त्यासोबतच कर्जमाफीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांवर देखील कर्जाचा बोजा वाढणार आहे. एकंदरीत स्थिती लक्षात घेता शासनाने तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी आहे. त्याकरिता ही पदयात्रा काढली आहे. मंगळवारी लोही गावातील शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बॅंकेकडून पीककर्जासाठी छळवाद होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या.
वेळेत पोचल्यानंतर देखील वेळ झाली नसल्याचे सांगणे, छोट्या कामासाठी सामूहिक सुविधा केंद्रावर पाठविणे, शासनाच्या अनुदानाचे पैसे पीककर्जातून कापणे असे आरोप शेतकऱ्यांनी केले. या वेळी बच्चू कडू यांनी त्याच ठिकाणी बॅंक व्यवस्थापकाला बोलावत त्याची खरडपट्टी काढली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.