Farmers Delhi Chalo Protest : कलम १४४, ड्रोनची नजर, शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा काय घडतयं दिल्लीत?

Protest Tractor Trolley : उत्तरेतील शेतकरी विविध मागण्यांसाठी मागच्या तीन वर्षात दुसऱ्यांदा ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आंदोलनासाठी दिल्लीकडे निघाले आहेत.
Farmers Delhi Chalo Protest
Farmers Delhi Chalo Protestagrowon
Published on
Updated on

Farmers Delhi Chalo Protest Highlights : उत्तरेतील शेतकरी विविध मागण्यांसाठी मागच्या तीन वर्षात दुसऱ्यांदा ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आंदोलनासाठी दिल्लीकडे निघाले आहेत. यावर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे. शंभू सीमेवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न आज(ता.१३) करण्यात आला. परंतु शेतकरी गणिमी काव्याने दिल्लीकडे कूच करत आहेत. तर केंद्राकडून दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. दिल्ली ते हरियाणाचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरियाणाहून दिल्लीकडे येणारा रस्ताही सील करण्यात येणार आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि या आंदोलनातील महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी आंदोलनाबाबत आत्तापर्यंतच्या 10 मोठ्या गोष्टी

उत्तरेतील शेतकरी राजधानी दिल्लीकडे येत असल्याने कलम १४४ लागू करण्यात आला आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू सीमा पूर्णपणे पोलिसांच्या छावण्यांमध्ये बदलल्या आहेत.

दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम झाले आहे तर पोलिसांनी रस्त्यावरच मोठे बॅरिकेड्स लावले आहेत.

दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांवर बंद असे फलक लावण्यात आले आहेत.

एमएसपी हमीभावासह अनेक मागण्यांवर शेतकरी आक्रमक असल्याने आम्ही नाही तर सरकारने रस्ता अडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

आम्हाला संघर्ष नको, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूने आहोत. केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत अजिबात गंभीर नसल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत.

शेतकरी धान्य पिकवतो आणि सरकार खिळे ठोकण्याचे काम करत असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. आम्ही लाठ्या आणि प्रसंगी बंदुकीच्या गोळ्याचाही सामना करण्यास तयार आहोत. सरकार फक्त दावा करते की त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे पण तसे अजिबात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दुसरीकडे, शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्ली सरकारने बवाना स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर करण्याचा केंद्राचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

दिल्ली-एनसीआर सीमेवर सुमारे १८ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स, सीआयएसएफ, बीएसएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

Farmers Delhi Chalo Protest
Farmer Protest Delhi: पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या काही जिल्ह्यात जमावबंदी; इंटरनेटही केलं बंद

सुरक्षा दलाचे जवान ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवत आहेत. सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक पिकांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत आहेत. यासोबतच शेतकरी वीज कायदा-२०२० रद्द करण्याची मागणीही केली जात आहे. याशिवाय लखीमपूर खेरी येथे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीसोबतच शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेला गुन्हे मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com