
Jalgaon News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बियाणे, खते आदी तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येक कृषी केंद्रात जनजागृतीपर फलक लावणे बंधनकारक केले आहे. त्यात शेतकऱ्यांना व्हॉट्स अॅपवर तक्रारी करता याव्यात यासाठी ९३०७०७६१०७ हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कापूस, खते यासंबंधी अनेकदा अडचणी असतात. काही वेळेस बियाणे, खते मुबलक असतानादेखील कृत्रीम टंचाई तयार केली जाते. अशात शेतकऱ्यांना खतसाठ्याची माहिती मिळावी यासाठी अॅप तयार झाले आहे. परंतु संबंधित खत विक्रेता, कृषी केंद्रचालकाची तक्रार करून त्यावर लागलीच कार्यवाही व्हावी यासाठी विविध समाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न कृषी यंत्रणा करीत आहेत.
हंगाम सुरू होताना अडचणी दूर व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व मोहीम अधिकारी विजय पवार हे कार्यरत आहेत.
त्यात शेतकऱ्यांपर्यंत गतीने पोचण्यासाठी व्हॉट्स अॅपचा उपयोग केला जात असून, त्यासंबंधी ९३०७०७६१०७ हा क्रमांक शुक्रवारी (ता.३०) जारी झाला. प्रत्येक कृषी केंद्र, खत विक्रेत्यांकडे एक जनजागृतीपर फलक लावला जात असून, त्यावर हा क्रमांक असणार आहे. कृषी विकास अधिकारी कार्यालयातून यासंबंधी कार्यवाही केली जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.