Farmer Association : शेतकरी संघटना करणार गांजा लागवडीने नववर्षाचे स्वागत

Shailendra Kapadnis : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने गांजा लागवड करून नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी दिली.
Ganja Sheti
Ganja ShetiAgrowon
Published on
Updated on

Nashik News : देशात कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर निम्म्याहून कमी झाले असून, मातीमोल भावाने गेल्या काही दिवसांपासून कांद्याची विक्री सुरू आहे. यंदा मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेती व्यवसायाची अपरिमित हानी झाली आहे.

‘निसर्ग पिकवू देत नाही, तर सरकार विकू देत नाही’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने गांजा लागवड करून नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी दिली.

Ganja Sheti
Onion Cultivation : मल्चिंग पेपरवर कांदा लागवड

श्री. कापडणीस म्हणाले, की ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाची ओळख आहे. परंतु शासनाच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती व्यवसायाची अक्षरशः माती झाली आहे. वर्षानुवर्षे शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या अंकुरण्याआधी मातीतच गाडल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, गारपीट, रोगट हवामान यांसह वीज कंपनीचा अनागोंदी कारभार, शेतीमालाच्या हमीभावाचे गाजर, बाजार समित्यांमध्ये होणारी लूट, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती आदी समस्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागत चालला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Ganja Sheti
Onion Production : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

उत्पादनखर्च देखील भरून निघत नसल्याने मातीमोल भावाने कांदा विकला जात असताना शेतकऱ्यांना मात्र कोणीच वाली नसतो. मागणीच्या तुलनेत कांद्याचे पीक कमी किंवा अधिक आल्यामुळे हा चढ-उतार सुरू असतो. कांद्याचे दर थोड्याफार प्रमाणात होते. मात्र, दिवाळीनंतर कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने सुमारे ४ हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा दीड ते दोन हजार रुपये भावाने विकला जात आहे.

नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे भाव पाडण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकार असंवेदनशील आहे. कोणत्याही शेतीमालाला भाव नसल्याने मातीमोल भावाने विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. द्याने गावातील आपल्या शेतात १ जानेवारीला गांजाची लागवड करणार आहेत.
शैलेंद्र कापडणीस, जिल्हा उपाध्यक्ष, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com