Summer Paddy Sowing : डहाणूत उन्हाळी भातशेतीची लगबग

Paddy Plantation : कासा, वांगर्जे, वाघाडी, चारोटी, सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, नानिवली, ऊर्से, सोनाळे, तवा या भागांत सध्या शेतकरी रब्बी हंगामातील भातशेतीच्या लागवडीसाठी पेरणी करण्यात मग्न आहेत.
Paddy Plantation
Paddy PlantationAgrowon

Summer Sowing Season : जिल्ह्यातील धामणी व कवडास धरणांतील कालव्यातून शेकडो गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. या पाण्यावर या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेती; तसेच भाजीपाल्यांची लागवड करतात. तालुक्यातील पूर्वेकडील भागातील शेतकरी कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत आहेत.

कासा, वांगर्जे, वाघाडी, चारोटी, सारणी, घोळ, भराड, रानशेत, वधना, पिंपळशेत, म्हसाड, नानिवली, ऊर्से, सोनाळे, तवा या भागांत सध्या शेतकरी रब्बी हंगामातील भातशेतीच्या लागवडीसाठी पेरणी करण्यात मग्न आहेत. कासा, वाणगाव कृषी मंडळांतर्गत ८८०.०९ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जात आहे.

Paddy Plantation
Summer Crop Production : ही आहेत उन्हाळी पीक उत्पादन कमी येण्याची कारणे

त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उदर निर्वाहासाठी हातभार लागत आहे. पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील पिकांमध्ये जास्त फायदा होतो. पावसाळ्यामध्ये रोगराई आणि अतिवृष्टी, पूर यांचा सामना करावा लागतो.

तर उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतीसाठी शेतकरी उत्सुक असतात. कासा, वाणगाव कृषी मंडळांमध्ये काही ठिकाणी हरभरा, तूर, भाजीपाला लागवड केली जाते.

या वर्षी कालव्यांतून थोडे उशिरा पाणी सोडले गेले. अनेक शेतकऱ्यांनी शेत नांगरून भातपेरणी केली आहे. काही ठिकाणी नांगरणी सुरू आहे. अनेक ग्रामीण भागात गरीब शेतकरी बैलजोडीच्या साह्याने काम करत आहेत. काही दिवसांत लागवडीला सुरुवात होणार असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

Paddy Plantation
Summer Crop Update : यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र का घटले?

बंधाऱ्याचा उपयोग

धावणी व कवडास कालव्याशेजारील हजारो शेतकरी रब्बी हंगामात शेती करतात. त्याचबरोबर सूर्या नदीवर जवळपास पाच ठिकाणी कोकण पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. ज्या भागामध्ये कालव्याचे पाणी पोहोचत नाही, त्यांना या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होतो. या बाबतीत तालुका कृषी अधिकारी वर्ग मार्गदर्शन करत आहेत.

सूर्या प्रकल्पातील कालव्याच्या पाण्यामुळे आम्हाला उन्हाळी भातपीक घेता येते. पावसाळीपेक्षा रब्बी हंगामातील भातशेतीत पीक चांगले येते. म्हणून या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी शेती करतात. याबरोबर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने काही बांधावरील तूर पीकही घेण्याचा प्रयत्न करतो.
- सुदाम कदम, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com