Kolhapur News : शेतकरी संघटनांच्या ऊसदराच्या आंदोलनांमुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला महिनाभर उशीर झाला. त्यामुळे नव्याने ऊसलागण हंगाम तब्बल महिनाभराने लांबला. पाटबंधारे खात्याने काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे नियोजन केले असल्याने शेतकऱ्यांनी नव्याने ऊसलागण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी केला जाणार असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणीटंचाई भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागणीकडे कल कमी दिसत आहे.
भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यात ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा ऊसदर आंदोलनामुळे साखर कारखाने महिनाभर उशिराने सुरू झाले. गळीत हंगाम तब्बल महिनाभराने पुढे ढकलल्याने रब्बी हंगाम उशिराने सुरू झाला. ऊस पिकाची लागण खरीप हंगाम संपल्यानंतर लगेचच १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणे आवश्यक असते;
पण अवकाळी पाऊस, शेतकरी संघटनांचे ऊसदर आंदोलन यामुळे रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला. त्यामुळे नदीकाठचे ऊसपीक पूरबाधित झाल्याने उत्पादन घटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. त्यासाठी हंगाम वेळेवर सुरू होणे गरजेचे आहे.
काळाम्मावाडी धरणाला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गळती काढण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात उसाची लागण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही पुढील धोका ओळखून नवीन ऊस लागणी कमी केल्या आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस लागण क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.